Assam Anti-Encroachment Drive : अवघ्या २ दिवसांत आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यातील ६६० हेक्टर वनभूमी अतिक्रमणमुक्त !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली माहिती

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी राज्यातील बेकायदेशीर नियंत्रणे हटवण्याच्या मोहिमेवर प्रकाश टाकला. त्यांनी म्हटले की, गेल्या २ दिवसांत राज्यातील श्रीभूमी जिल्ह्यात ६६० हेक्टर वनभूमी अतिक्रमणमुक्त करण्यात आली असून २२० हेक्टर भूमी अद्याप परत मिळवणे शेष आहे. ८ फेब्रुवारीला अधिकार्‍यांनी १२ सहस्र हेक्टरपेक्षा अधिक अतिक्रमित मालमत्ता परत मिळवण्याच्या प्रयत्नात पाथरकांडी मतदारसंघातील राखीव जंगलांमधील बेकायदेशीर वस्त्यांवर महत्त्वपूर्ण कारवाई चालू केली. २ सहस्रांहून अधिक कुटुंबांना तेथून बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले.

१. ईश्वरपार, माधवपूर, बलिया, मधुरबोंड, चागलमोया, मागुरा आणि जोगीसोरा यांसह अनेक गावांतील बेकायदेशीर रहिवाशांना विशिष्ट समयमर्यादेत वनभूमी सोडण्याचे निर्देश देण्यात आले.

२. बेकायदेशीर घरे, तात्पुरत्या इमारती आणि वाढलेली वनस्पती तोडून परिसराला त्याच्या मूळ जंगल स्थितीत परत आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.

३. अधिकार्‍यांच्या मते, हा उपक्रम वनक्षेत्रांचे पुनर्वसन करण्यासाठी आणि पुढील अतिक्रमणे थांबवण्यासाठी सततच्या कार्यक्रमाचा एक घटक आहे.

संपादकीय भूमिका

अतिक्रमणाच्या विरोधात आसाममधील भाजप शासनाने जी रोखठोक भूमिका घेतली, तशीच भूमिका अन्य भाजपशासित सरकारे केव्हा घेणार आहेत, असा प्रश्न राष्ट्रप्रेमी विचारत आहेत !