Jamaat-e-Islami Manifesto : बांगलादेशातील इस्लामी कट्टरतावादी पक्ष ‘जमात-ए-इस्लामी’चे निवडणूक घोषणापत्रात भारताशी चांगल्या संबंधांचे आश्वासन

‘जमात-ए-इस्लामी’चे प्रमुख शफीकुर रहमान

ढाका – बांगलादेशामध्ये १२ फेब्रुवारी या दिवशी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख इस्लामी कट्टरतावादी राजकीय पक्ष असलेल्या ‘जमात-ए-इस्लामी’ने ४ फेब्रुवारी या दिवशी त्याचे घोषणापत्र प्रसिद्ध केले. त्यात भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला आहे. (निवडणूक जिंकण्यासाठी ‘जमात’ची ही धूर्त खेळी नसेल कशावरून ? – संपादक)

‘जमात-ए-इस्लामी’चे प्रमुख शफीकुर रहमान यांनी सत्तेत आल्यास प्रशासनात पुरेशा संख्येने महिलांचा समावेश करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. या पक्षाने एकाही महिलेला उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवलेले नाही. (यातून या इस्लामी कट्टरतावादी पक्षाचा ढोंगीपणा लक्षात येतो ! – संपादक) इस्लामी कट्टरतावादी पक्ष ‘जमात-ए-इस्लामी’ने त्याच्या घोषणापत्रात भारतासह शेजारी देशांशी रचनात्मक आणि सहकार्यपूर्ण संबंध ठेवण्याचे वचन दिले आहे.

संपादकीय भूमिका

भारताला सतत पाण्यात पहाणार्‍या, तसेच बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार करणार्‍या ‘जमात’च्या घोषणापत्रातील या सूत्रावर कोण विश्वास ठेवणार ?