उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे केंद्र सरकारला आवाहन

मुंबई – बांगलादेशामध्ये हिंदूंच्या नियमित हत्या होत आहेत. तेथे २ हिंदूंना नुकतेच जिवंत जाळण्यात आले. मागील ४-५ मासांपासून बांगलादेशात हिंदूंच्या हत्या नियमितपणे होत आहेत. मंदिरे पाडली जात आहेत. हिंदूंच्या घरांवर आक्रमणे होत आहेत आणि हिंदूंना जाळण्यात येत आहे. केवळ शांततेचा संदेश देऊन बांगलादेशातील हिंदूंच्या हत्या थांबतील कि इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे सैनिकी कारवाई करूनच तेथे शांतता नांदेल, याचा विचार करावा, असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला केले आहे.
या वेळी राऊत म्हणाले, ‘‘आपला देश निश्चितच शांततावादी आहे. आम्ही कधीच कुणावर स्वत:हून आक्रमण करत नाही; परंतु बांगलादेशात शेकडो हिंदूंच्या हत्या होत असतील, तर शांततेच्या संदेशाला काही अर्थ नाही. याचा अर्थ ‘युद्ध करा’, असा होत नाही; परंतु बांगलादेशातील हिंदूंचे प्राण आणि संपत्ती वाचवावी लागेल. त्यामुळे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी केवळ शांततेचे संदेश देऊन उपयोग नाही. भारतातही सर्वच क्षेत्रांत अशांतता आणि अस्थिरता आहे. त्यामुळे जेव्हा शांततेचा संदेश दिला जातो, तेव्हा ‘भारतामध्ये अशांतता कुणामुळे आहे ? त्याला उत्तरदायी कोण आहे ?’ याचा विचार जनता निश्चितच करत असेल. जगाला शांततेचा संदेश देतांना राष्ट्रपतींनी बांगलादेशात हिंसाचार उसळला आहे, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !