अशांचे नाव इतिहासात कधी नोंदवले जाईल का ?

अशांचे नाव इतिहासात कधी नोंदवले जाईल का ?

‘शरीर, मन आणि बुद्धी यांनी समजेल असे विश्‍वात १ लक्षांश टक्केही नसतांना त्यांनी कळलेल्या गोष्टींचा बाऊ करणार्‍यांचे नाव इतिहासात कधी नोंदवले जाईल का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

शिक्षणात माणुसकी न शिकवल्याचा परिणाम !

‘शाळेपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कोणत्याही शिक्षणात माणुसकी न शिकवल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात जनतेला लुबाडणारे व्यावसायिक आणि नोकरी करणारे निर्माण झाले आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

लहानपणीच्या शाळेतील मित्रांची ८० व्या वर्षीही मैत्री असणे

लहानपणीच्या शाळेतील मित्रांची ८० व्या वर्षीही मैत्री असणे

महाविद्यालयातील मित्र, नोकरीतील सहकारी, शेजारी, नातेवाईक इत्यादींशी लहानपणीच्या शाळेतील मित्रांची जवळीक असते, तशी नसते; कारण शाळेतील मित्रांच्या जवळीकीत स्वार्थ नसतो.

वृद्धाश्रमात आई-वडिलांना ठेवणे अत्यंत लज्जास्पद !

वृद्धाश्रमात आई-वडिलांना ठेवणे अत्यंत लज्जास्पद !

‘भारतीय संस्कृतीत कधीही वृद्धाश्रम नव्हते. ते पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे. ते आई वडिलांविषयी कृतज्ञतेऐवजी द्वेष दर्शवते.

समाजपुरुषाने साधना करण्याचे महत्त्व !

समाजपुरुषाने साधना करण्याचे महत्त्व !

‘राजकीय पक्ष ‘आम्ही हे देऊ, ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी बनवतात आणि स्वार्थामुळे जनतेत भांडणे होतात. याउलट साधना त्याग करायला शिकवते. त्यामुळे जनतेत भांडणे होत नाहीत, तर सर्व जण एक कुटुंब म्हणून आनंदात रहातात !’

केवळ मंदिरांचेच सरकारीकरण होणे संतापजनक !

‘चर्च किंवा मशिदी यांचे सरकारीकरण जगात कुठे होत नाही; मात्र अध्यात्म विषयाचे जगाचे केंद्र असलेल्या भारतात मंदिरांचे सरकारीकरण केले जाते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रातील कायदे !

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रातील कायदे !

हिंदु राष्ट्रातील सर्व कायदे धर्माधिष्ठित असतील. त्यामुळे त्यांच्यात पालट करावा लागणार नाही आणि त्यांच्या पालनाने गुन्हे न होता साधनाही होईल.

अधार्मिक आणि नीतीशून्य विषयांत भारताने प्रगती केली !

अधार्मिक आणि नीतीशून्य विषयांत भारताने प्रगती केली !

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७४ वर्षांच्या काळात बहुतेक राजकीय पक्षांनी भारताची खरी प्रगती केलीच नाही, उलट सर्व अधार्मिक आणि नीतीशून्य विषयांत भारताने प्रगती केली आहे !

विज्ञानाची मर्यादा !

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो !

‘भारतातील हिंदूंमध्ये हिंदु धर्म सोडला, तर भाषा, सण, उत्सव, कपडे इत्यादी विविध राज्यांमध्ये निरनिराळे आहेत. त्यामुळे हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो. हिंदूंनी धर्माचे महत्त्व आतातरी लक्षात घेऊन सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.’