घरोघरी आयुर्वेद

दही आणि गूळ हे मिश्रण शरिराचे पोषण अन् स्निग्धता निर्माण करणारे, तसेच मनाला आनंद देणारे अन् वात न्यून करणारे आहे. असे असले तरीही या मिश्रणाच्या नियमित सेवनाने जंत वा त्वचाविकार होऊ शकतात.

रक्तातील हिमोग्लोबिन वाढवणारे गाजर, बीट आणि पालक यांचे सूप

३ ते ४ आठवडे साधारण १ पाण्याचा पेला (अनुमाने ४०० मि.लि.) सूप प्रतिदिन प्यायल्याने हिमोग्लोबिन ८ टक्क्यांवरून ११ ते १२ टक्क्यांपर्यंत जाते, असा अनुभव आहे.

आरोग्य आणि आयुर्वेद यांची सांगड घाला !

आयुर्वेदाने सांगितलेले नियम समजून घेऊन त्याप्रमाणे आपली दिनचर्या किंवा ऋतुचर्या आखल्यास ‘जीवेत शरदः शतम् ।’ याप्रमाणे १०० वर्षे  आरोग्यसंपन्न आयुष्य जीवन जगा, हा आयुर्वेदीय ऋषीमुनींचा आशीर्वाद प्रत्येकाला निश्‍चितच मिळेल.

‘रोग होऊ नयेत’ म्हणून आयुर्वेदाने सुचवलेले उपाय

मन आणि इंद्रिये ताब्यात ठेवणे अन् काम, क्रोध इत्यादी आवेगांचे नियंत्रण करणे. खोकला, शौच, लघवी आदी नैसर्गिक वेग दाबून न धरणे. आरोग्यासाठी हितकर आहार-विहार करणे

सर्दीवरील आयुर्वेदीय उपचार

सर्दीचे मूळ कारण ‘व्हायरस’ जातीचे जंतू ! जरी जंतूंमुळे सर्दी होत असली, तरी एकंदरीतच सर्व शरिराची (नाकाच्या अंतस्त्वचेतील) रोगप्रतिकारक शक्ती न्यून झाल्यास सर्दी होते.

खोकल्यासाठीचे आयुर्वेदीय उपाय

अ‍ॅलोपॅथी आणि होमिओपॅथी ही औषधे तीन मास घेऊनही न थांबणारा कोरडा खोकला आयुर्वेदीय औषधांनी केवळ २० दिवसांत पूर्णपणे नाहीसा होणे

राजाने बुद्धी शुद्धी करण्यासाठी आयुर्वेदाचार्यांच्या संगतीत रहावे !

आयुर्वेदाच्या अभ्यासावरून आपण अशा विचारधारेवर येतो की, भावी काळात प्रत्येक मंत्री हा आयुर्वेदाचार्य असलाच पाहिजे; कारण राजा, राष्ट्र आणि समाज यांचे आरोग्य त्यांच्या संगानेच स्वस्थ रहाते.

आयुर्वेदाची महनीय परंपरा

काय, शल्य, शालाक्य, बाल, ग्रह, विष, रसायन आणि वाजीकरण अशी आयुर्वेदाची आठ अंगे आहेत. आयुर्वेदाच्या सर्व संहिता आणि संग्रह ग्रंथ यांत ब्रह्मदेवाला आयुर्वेदाचा आदिप्रवक्ता म्हटले आहे.

आयुर्वेदातील महत्त्वपूर्ण चिकित्सा असणारे पंचकर्म !

‘निरोगी मनुष्याच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि रोगी मनुष्याला रोगमुक्त करणे’ हे आयुर्वेदाचे प्रमुख उद्दिष्ट साध्य करावयाचे पंचकर्म हे एक साधन आहे. रोगापासून मुक्तता आणि निरोगी, दीर्घायुष्य देणारे ही एक आयुर्वेदाची स्वतंत्र अन् खास चिकित्सापद्धत आहे.

आयुर्वेदाला विसरून स्वत:ची आणि देशाची हानी करणारे भारतीय !

निसर्गाने मुक्त हस्ते उधळलेला, बहाल केलेला अनमोल खजिना ! आयुर्वेदातील औषधे मंत्रांवर आधारित आहेत. आपल्या ऋषिमुनींनी खोलवर अभ्यास करून, खडतर तपश्‍चर्या, म्हणजेच साधना करून मंत्र सिद्ध करून घेतले आणि आम्हाला किती मोलाचा हा खजिना दिला आहे.