अन्‍नाचे पचन नीट होण्‍यासाठी चावून चावून जेवावे

‘आपण जे अन्‍न जेवतो, ते पूर्णपणे पचले, तरच शरीर निरोगी रहाते. जेवण नीट पचले नाही, तर पोटात वायू (गॅसेस) होणे, बद्धकोेष्‍ठता यांसारखे त्रास होतात. जेवण नीट पचण्‍यासाठी ते पुष्‍कळ बारीक व्‍हायला हवे. यासाठी चावून चावून जेवायला हवे.’

बुरशीजन्‍य त्‍वचाविकारांचा प्रतिबंध होण्‍यासाठी कपडे नीट वाळवूनच वापरावेत

‘पावसाळ्‍यात वातावरणामध्‍ये आर्द्रता अधिक असल्‍याने बुरशीजन्‍य त्‍वचाविकार (फंगल इन्‍फेक्‍शन) होण्‍याची शक्‍यता वाढते. या विकारांचा प्रतिबंध होण्‍यासाठी ओलसर कपडे वापरणे टाळावे.’

पहिल्‍या पावसात भिजणे टाळावे

आजकाल वायूप्रदूषणामुळे पावसाच्‍या पाण्‍यात अनेक प्रदूषित घटक मिसळलेले असण्‍याची शक्‍यता असते. या प्रदूषित घटकांचा त्‍वचेवर अनिष्‍ट परिणाम होऊ शकतो. त्‍यामुळे पहिल्‍या पावसात भिजणे टाळायला हवे.’

जलनेती

एका नाकपुडीतून पाणी घालून दुसरीतून बाहेर काढणे याला ‘जलनेती’ म्‍हणतात. नेतीसाठी किंचित कोमट पाणी मीठ घालून वापरावे. नेतीचे एक विशिष्‍ट प्रकारचे भांडे (नेती पॉट) असते. त्‍यामुळे नाकपुडीत पाणी घालणे सोपे जाते. वाटी किंवा भांडे यांनीही नाकात पाणी घालू शकतो. आरंभी जलनेती करतांना थोडा त्रास होतो. नंतर सवयीने त्रास होत नाही.

अती मात्रेत जेवणे किंवा अती आग्रह करून वाढणे टाळावे !

अती मात्रेत जेवल्याने वात, पित्त आणि कफ हे तिघेही बिघडतात. हे अनेक रोगांचे कारण ठरू शकते. आजकाल लग्नसमारंभांचे दिवस असल्याने आवडीचे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे घडू शकते. आरोग्य राखण्यासाठी अती प्रमाणात जेवणे टाळायला हवे.

उन्हाळ्यामध्ये हलका व्यायाम करावा !

 ‘उन्हाळ्यामध्ये शरिराची शक्ती न्यून झालेली असते. या दिवसांमध्ये व्यायाम करायचा झाल्यास तो योगासने आणि प्राणायाम अशा स्वरूपाचा असावा. सवय नसतांना वजन उचलण्याचे व्यायाम किंवा ज्या व्यायामांनी लवकर दमायला होते, असे व्यायाम करणे टाळावे.’

नेहमीच्या विकारांवरील प्राथमिक उपचार

‘पाव चमचा सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण अर्धी वाटी गरम पाण्यात मिसळून दिवसातून ३ – ४ वेळा प्यावे. हा उपचार ५ ते ७ दिवस करावा.

प्रयत्नांमध्ये खंड पडणे स्वाभाविक असल्याने त्याविषयी वाईट वाटून न घेता पुन्हा प्रयत्न चालू करावेत !

काही जण प्रयत्नांमध्ये खंड पडल्यावर ‘मला हे जमणारच नाही’, असा विचार करून प्रयत्न करायचेच सोडून देतात. असे न करता जेव्हा प्रयत्नांमध्ये खंड पडेल, तेव्हा पुन्हा नव्याने प्रयत्न चालू करावेत.

अन्न पदार्थांच्या रंगांची आरोग्यासाठी उपयुक्तता !

रंग हे विश्वाच्या सौंदर्याचे सार आहे. अगदी आकाशाचा रंग निळा, झाडांचा हिरवा, विविध फुलांचे अनेक रंग, इंद्रधुनष्याचे सप्तरंग. विचार करा ना, हे सगळे रंग नाहीसे झाले, तर ही सृष्टी आणि पर्यायाने आपले जीवन किती निरस होईल.