काही आजारांवरील आयुर्वेदीय उपाय

डोळ्यांत खाज येणे : द्राक्षांचा रस काढून तो आटवावा. थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावा. रात्री डोळ्यांत अंजन म्हणून तो लावल्यास डोळ्यांची खाज बंद होते.

 मोक्षप्राप्तीसाठी मनुष्यदेह सुदृढ करणे, हीच आयुर्वेदाची धारणा !

धर्मार्थकाममोक्ष यांचे साधन ‘सुदृढ देह’ हे असल्यामुळे आरोग्य उत्तम असेल, तरच मानवी जीवनाचे सार्थक होईल. म्हणजे ऐहिक सुखाचे सगळे सोहळे भोगत (कर्मयोगात आयुष्य व्यतीत करणे) ‘मानवाला मोक्ष मिळावा’, हेच धर्माचे उद्दिष्ट आहे.

आयुर्वेदाचे महत्त्व

आयुर्वेदशास्त्र हेच मुळी सृष्टीच्या मूळ स्वरूपाला धरून पंचमहाभूतांच्या गुणावगुणांवरून ठरवून केले आहे. मानवाचे मन, बुद्धी आणि आत्मा यांचा विचार त्यात केला आहे.

व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणारा व्यापक आयुर्वेद !

आयुर्वेद हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. आयुर्वेदात व्यक्तीचा सर्वांगाने म्हणजे तिच्या प्रकृतीचा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर विचार केला जातो.