कुशाग्र बुद्धीमत्तेच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांशी बालबुद्धी असणारे राहुल गांधी तुलना करतात ! – दयाशंकर तिवारी, माजी महापौर, नागपूर 

अंधार कोठडीत कोलू चालवत हातांत कड्या आणि पायांत बेड्या असतांना कोळशाने भिंतीवर ६ सहस्र कविता लिहिल्या अन् त्या स्मरणात ठेवल्या.

निवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे करण्यासाठी राज्यशासन सकारात्मक ! – राजपत्रित अधिकारी महासंघ

महाराष्ट्रातील शासकीय सेवेतील कर्मचार्‍यांच्या निवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे करावी, यासाठी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक झाली.

नवी मुंबईत क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन !

७ ते १० एप्रिल या काळात सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत प्रदर्शन खुले !

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी, पोलिसांचा सौम्य लाठीमार !

येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच्या वेळी प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. येथील ‘अर्धनारी नटेश्वर यात्रा समिती’च्या वतीने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिता शहाजी महाराज यांच्या कर्नाटक येथील ३५० वर्षे जुन्या समाधीची दुरवस्था

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण करणार्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी शहाजी महाराज यांचे समाधीस्थळ विकसित न करणे हे लज्जास्पद !

गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही ! – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

रायगडासह अन्य गड-दुर्गांचे संवर्धन आणि साकारण्यात येणारे शिवसृष्टीसारखे प्रकल्प यांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्‍वासन राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणार्‍यांनी स्वतःची पात्रता ओळखून घ्यावी ! – शिवाजीराव पाटील, माजी खासदार

स्वातंत्र्यलढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यावर टीका करणारे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना देशाविषयी प्रेम नाही. सावरकरांवर टीका करणार्‍यांनी आधी त्यांची पात्रता ओळखून घ्यावी, अशी टीका त्यांनी केली.

ऊस वाहतूकदारांची ७ कोटींची फसवणूक !

या वर्षीच्या साखर हंगामात श्री सोमेश्वर कारखान्याच्या ऊस वाहतूकदारांची ९३ टोळ्यांकडून तब्बल ७ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या माहितीनुसार राज्यात वाहतूकदारांची मुकादमांकडून ४४६ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपकीर्तीला ‘सावरकर गौरव यात्रा’ हे चपखल उत्तर ! – अभिनेते शरद पोंक्षे

देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वा. सावरकर यांनी स्वत:च्या आयुष्याची होळी केली. अशा महान सुपुत्राचा गौरव व्हायला हवा होता; मात्र काँग्रेसने गलिच्छ राजकारण करून स्वा. सावरकर यांना अपकीर्त करण्याचे काम केले. त्यामुळे ‘सावरकर कोण होते ?’ हे सांगण्याची आज आवश्यकता निर्माण झाली.