दळणवळण बंदी असतांनाही मुंबईतील प्रवाशांना समुद्रमार्गे गुहागरमध्ये आणणार्‍या बोट मालकांवर गुन्हा नोंद

देशात दळणवळण बंदी असतांना आणि त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा बंद असतांना मुंबईतील प्रवाशांना समुद्रमार्गे गुहागरमध्ये आणणार्‍या बोट मालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी ही माहिती दिली आहे.

दळणवळण बंदी झुगारून उत्तरप्रदेशातील मशिदींमध्ये नमाजपठणासाठी गर्दी करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद

स्वतःच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या अशा जनताद्रोह्यांवर केवळ गुन्हा नोंद न करता सरकारने त्यांना तात्काळ अटक करून आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

दळणवळण बंदी झुगारून चारचाकी वाहनातून फिरणार्‍या गुंड पिता-पुत्राकडून पोलिसाला मारहाण

दळणवळण बंदी असतांनाही येथे चारचाकी वाहनातून फिरणारे पिता-पुत्र यांना हटकणार्‍या पोलिसाला त्या दोघांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. धनसिंह आणि त्यांचा मुलगा उमेश सिंह यांना एका पोलिसाने अडवून प्रश्‍न विचारल्यावर त्यांच्यात वाद झाला

किमान कर्मचार्‍यांना उपस्थित ठेवून पतसंस्थाचे कामकाज चालू ठेवण्याचे निर्देश ! – अधिवक्ता दीपक पटवर्धन

सहकारी पतसंस्थांमध्ये जनतेचा पैसा गुंतलेला असतो, सबब ग्राहकांची पैशांची मागणी पूर्ण करण्यासाठी पतसंस्था चालू रहाणे आवश्यक ठरते, किमान कर्मचार्‍यांना उपस्थित ठेवून कामकाज करावे, असे निर्देश आज सहकार आयुक्त यांनी परिपत्रक काढून दिले आहेत.

मशिदीत न जाता घरातच नमाज पठण करा ! – ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे आवाहन

‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने इतक्या उशिरा हे आवाहन का केले ?  दळणवळण बंदीचा नियम मोडून नमाजपठणासाठी जाणार्‍यांविषयी ते काही बोलत का नाहीत ? यावरून ‘देशात जे काही नियम सिद्ध केले जातात, ते केवळ हिंदूंसाठीच’, हेच सिद्ध होते !

विविध घटकांसाठी १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ घोषित

कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात दळणवळण बंदी करण्यात आली आहे. या बंदीचा गरीबांना फटका बसू नये, यासाठी केंद्र सरकारकडून ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने’च्या अंतर्गत १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांच्या ‘पॅकेज’ देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी केली.

देशभरात १४ एप्रिलपर्यंत पथकर वसुलीला स्थगिती

देशभरात दळणवळण बंदी लागू असल्याने कारणाविना वाहनाने कुणालाही प्रवास करता येत नाही. या काळात अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने, तसेच वैद्यकीय कारणास्तव होणार्‍या वाहतुकीलाच अनुमती आहे.

अमेरिकेत लुटालूट होण्याच्या भीतीने लोकांची शस्त्रखरेदीसाठी गर्दी !

कोरोनामुळे बेरोजगारी वाढल्याने भारतातही लुटालूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सरकारने आतापासूनच यावर ठोस उपाययोजना काढली पाहिजे !

भारतात १५ मेपर्यंत १३ लाख लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता

लोकहो, हा वेग रोखणे आपल्या सर्वांच्या हातात आहे, हे लक्षात घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन प्रयत्न करूया !

देशात कोरोनाच्या मृतांची संख्या वाढणार नाही ! – डॉ. नरिंदर मेहरा, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद

रोग प्रतिकारशक्तीमध्ये भारताचा प्रथम क्रमांक आहे. त्यामुळे इतर देशांप्रमाणे भारतात कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या वाढणार नाही; पण हे सिद्ध करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे. देशात अल्प प्रमाणात मृत्यू होण्याची ३ कारणे असून यामध्ये शारीरिक अंतर, रोगप्रतिकार शक्ती आणि…