गोवा : ‘कीर्तीचक्र’ पुरस्कारप्राप्त  हुतात्मा नरेंद्र मयेकर यांच्या स्मारकावर ‘गोबी मंच्युरियन’ विक्रेत्याचे दुकान !

काही वर्षांपासून पोलीस रात्री आणि दिवसा चारचाकी वाहनाद्वारे सर्वत्र गस्त घालतात. त्यांना हे दिसले नाही का ? येथील नगरपालिका काय करत आहे ? जे गोवा फर्स्ट संघटनेला दिसते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाला का दिसत नाही ?

मुले आई-वडिलांचा सांभाळ करत नसतील, तर संपत्ती परत मिळवता येते !

सोरेगांव येथील ‘ब्रिजधाम’ वृद्धाश्रमात आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. न्यायाधीश पाटील यांनी मृत्यूपत्र कशाप्रकारे सिद्ध करावे ? याविषयीही ज्येष्ठ नागरिकांना माहिती दिली.

शाळांमधील अल्प पटसंख्येत शिक्षण नीट होत नाही ! – हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ञ

अल्प पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे सध्या वादळ उठले आहे. शैक्षणिक वर्तुळातून याला तीव्र विरोध होत आहे; मात्र विरोध केवळ भावनिक होऊ न घेता वास्तव समजून घेण्यात यावे.

ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद ?

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद केली आहेत. ‘निवडणूक आयोगाला अशा प्रकारची कोणतीही प्रतिज्ञापत्रे लागत नाहीत, तसेच एखाद्या पक्षाला मान्यता देणे किंवा चिन्ह देणे याचे नियम ठरलेले आहेत.

ऊस दर आंदोलकांनी ट्रॅक्टरचे १२ टायर फोडले !

आतापर्यंत आंदोलकांनी १२ टायर फोडले असून वाखरी तालुका येथील थोरात पेट्रोलपंपाच्या समोर ही घटना घडली.

संभाजीनगर येथे वाहतुकीचे नियम न पाळणार्‍यांवर आजपासून दंडात्मक कारवाई चालू होणार !

संभाजीनगर ते नाशिक येथून मुंबईकडे जाण्यासाठी वाहनधारकांनी वैजापूर-गंगापूर मार्गाचा पर्याय निवडला आहे. या मार्गावर चारचाकी वाहनांच्या रहदारीच्या प्रमाणात काही मासांपासून लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण महामार्ग सुरक्षा पोलिसांनी नोंदवले आहे.

‘मुले पळवणारी टोळी कार्यरत आहे का ?’ याविषयी अन्वेषण चालू ! – विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, मुंबई

मोहम्मद आणि त्याची पत्नी या नवजात बालिकेची विक्री करणार होते. ‘यामागे मुले पळवणारी टोळी कार्यरत आहे का ?’ याविषयी अन्वेषण चालू असल्याचे फणसळकर यांनी सांगितले.

हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खाडये यांचा ‘हलाल जिहाद’च्या संदर्भात सांगली जिल्हा जागृती दौरा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल जिहाद’च्या संदर्भात देशव्यापी जागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यात तालुका स्तरावर ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ची स्थापना करण्यात आली. त्याचा वृत्तांत . . .

धाराशिव येथील मदरशामध्ये आढळले ३४ शाळाबाह्य विद्यार्थी !

मदरशामध्ये ८० मुली शिक्षण घेत असल्याची नोंद असतांना शिक्षण विभागाच्या पथकाला प्रत्यक्षात एकही मुलगी आढळली नाही. ३४ मधील १७ विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.  

ग्रहणकाळात शिर्डीसह देशातील अनेक मंदिरे बंद असल्याने भाविक देवदर्शनास मुकले !

ग्रहणकाळात शिर्डीसह राज्यातील अनेक मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. काही मंदिरे सकाळपासून बंद होती, तर काही मंदिरे दुपारी ४ ते ६.३० या कालावधीत बंद होती.