
मुंबई – निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद केली आहेत. ‘निवडणूक आयोगाला अशा प्रकारची कोणतीही प्रतिज्ञापत्रे लागत नाहीत, तसेच एखाद्या पक्षाला मान्यता देणे किंवा चिन्ह देणे याचे नियम ठरलेले आहेत. गेल्या २० वर्षांत वेगवेगळ्या आयुक्तांनी त्यासंदर्भात दिलेले निर्णय प्रमाण आहेत. त्यामुळे कुणाची प्रतिज्ञापत्रे किती आहेत ? कुणाचे रहित झाले ? कुणाचे टिकले ? हे सगळे स्वत:च्या समाधानासाठी चालले आहे’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचे अधिवक्ता विवेक सिंग यांनी प्रतिज्ञापत्रे बाद केल्याचे वृत्त फेटाळले आहे. आयोगासमोर आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी ठाकरे गटाने २ ट्रक भरून ११ लाख प्रतिज्ञापत्रे जमा केली होती. त्यातील वरील प्रतिज्ञापत्रांचा ‘फॉरमॅट’ चुकीचा असल्याने ती बाद ठरवण्यात आल्याचे समजते.
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री