‘इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तिसवाडी (गोवा)’ शाखेच्या वैद्यकीय शैक्षणिक कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘मनोविकार आणि अध्यात्मशास्त्र’ या विषयावर प्रबोधन !

‘इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आय.एम्.आय.च्या) तिसवाडी (गोवा)’ शाखेच्या ‘सी.एम्.ई.’ (CME) मध्ये ‘अध्यात्मशास्त्राचे मनोविकारांमागील कारणे, उपचार आणि प्रतिबंध यांतील स्थान’ या विषयावर पावरपॉईंटच्या माध्यमातून ऑनलाईन सादरीकरण करण्यात आले.

धर्मवीर संभाजी महाराज तलावामध्ये श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनास सोलापूर महापालिकेकडून निर्बंध !

पाण्यामध्ये ‘केवळ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याने प्रदूषण होते’, असा कुठलाही अहवाल नसतांना कशाच्या आधारावर श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांना बंदी केली जात आहे ?

महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये पशूंमध्ये लंपी त्वचारोगाचा वाढता संसर्ग !

महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये पशूंमध्ये लंपी त्वचारोगाचा संसर्ग वाढत आहे. या आजारामुळे गोवर्गीय प्रजातींमधील २९ बाधित जनावरांचा मृत्यू झाला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण राज्य ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

महापालिकेने ‘यांत्रिक पद्धतीने विसर्जन’ करणारे यंत्र (रोलर मशीन) हटवल्याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून प्रशासनाचे आभार !

कोल्हापूर महापालिकेने घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी इराणी खण येथे ‘यांत्रिक पद्धतीने विसर्जन’ (रोलर मशीन) करणारे यंत्र बसवले होते. यात यंत्रावर एका बाजूने मूर्ती ठेवण्यात येत होत्या.

पनवेल येथे ११ भाविक विजेच्या धक्क्याने घायाळ !

वडघर खाडी परिसरात विसर्जन घाटावर रात्री ८.३० वाजता हा प्रकार घडला. गर्दीच्या वेळी विजेची तार तुटली आणि ती थेट गणेशभक्तांवरच पडली. त्यामुळे विजेचा तीव्र धक्का बसला.

पिंपरी (पुणे) येथील बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून हत्या !

पैसे आणि प्रेमप्रकरणामुळे लहान मुलाची हत्या केली, यातून समाज दिवसेंदिवस किती निर्दयी आणि स्वार्थी होत आहे, याचे हे उदाहरण ! या प्रसंगातून समाज नीतीवान होण्यासाठी धर्मशिक्षणाचीच आवश्यकता किती आहे, हे पुन्हा अधोरेखित होते !

मुंबई, रायगड आणि रत्नागिरी येथील समुद्रकिनार्‍यांवर आलेले श्री गणेशमूर्तींचे अवशेष उचलले !

मनसेच्या वतीने ‘आपला समुद्रकिनारा, आपले दायित्व’ मोहीम !

१२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता !

१२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस्. होसाळीकर यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली.

शिवाजी विद्यापिठाच्या परीक्षा विभागात झालेल्या गोंधळाप्रकरणी अभाविप आंदोलन करणार !

शिवाजी विद्यापिठाच्या परीक्षा विभागात झालेला सावळा गोंधळ विद्यापीठ प्रशासन दायित्वाने का सोडवत नाही ? यासाठी आंदोलन का करावे लागते ?

प्रभादेवी (मुंबई) येथे बेस्टच्या वीज सबस्टेशन केबिनला भीषण आग !

या आगीत दोन मोठे ट्रान्सफॉर्मर आणि तीन मोठे स्विच जळून खाक झाले आहेत, तर केबिनजवळील ५ दुचाकींना आगीची झळ बसल्याने हानी झाली आहे.