
सातारा, १२ जानेवारी (वार्ता.) – स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या सातारा येथे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात पार पडले. संमेलनातील स्वागतकमानी, प्रदर्शन, सज्जे इत्यादी सजावटीसाठी २० लाख रुपयांचे लोखंडी साहित्य खरेदी करण्यात आले होते; मात्र साहित्य संमेलन झाल्यानंतर हेच लोखंडी साहित्य अवघ्या २ लाख ३७ सहस्र रुपयांमध्ये भंगारात विकण्यात आले आहे.
संमेलनस्थळावरून ४ टेंपो भरून नेण्यात आलेले लोखंडी भंगाराचे वजन ७.९० टन एवढे भरले. मुंबई येथील एका कंत्राटदाराच्या वतीने हे काम करण्यात आले असून भंगारात घातलेल्या एका किलोला ३० रुपये दर देण्यात आला असल्याचे तेथील कामगारांकडून समजले. साहित्य संमेलनासाठी करण्यात आलेल्या सजावटीसाठी लोखंडी साहित्याच्या दुप्पट मजुरी दिल्याची चर्चा आहे. साहित्य संमेलनाचा मंडप उभारणे आणि सजावट यांचे काम साहित्य संमेलनाच्या आधी १५ दिवस चालू होते.
संपादकीय भूमिकासाहित्य संमेलनातून भारताची आर्थिक प्रगती आणि विकास यांवर खोचक टीका करणारे गिरीश कुबेर संमेलनाच्या आयोजनातील आर्थिक काटकसरीविषयीही काही भाष्य करतील का ? |
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !