
सातारा, १२ जानेवारी (वार्ता.) – स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या सातारा येथे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात पार पडले. संमेलनातील स्वागतकमानी, प्रदर्शन, सज्जे इत्यादी सजावटीसाठी २० लाख रुपयांचे लोखंडी साहित्य खरेदी करण्यात आले होते; मात्र साहित्य संमेलन झाल्यानंतर हेच लोखंडी साहित्य अवघ्या २ लाख ३७ सहस्र रुपयांमध्ये भंगारात विकण्यात आले आहे.
संमेलनस्थळावरून ४ टेंपो भरून नेण्यात आलेले लोखंडी भंगाराचे वजन ७.९० टन एवढे भरले. मुंबई येथील एका कंत्राटदाराच्या वतीने हे काम करण्यात आले असून भंगारात घातलेल्या एका किलोला ३० रुपये दर देण्यात आला असल्याचे तेथील कामगारांकडून समजले. साहित्य संमेलनासाठी करण्यात आलेल्या सजावटीसाठी लोखंडी साहित्याच्या दुप्पट मजुरी दिल्याची चर्चा आहे. साहित्य संमेलनाचा मंडप उभारणे आणि सजावट यांचे काम साहित्य संमेलनाच्या आधी १५ दिवस चालू होते.
संपादकीय भूमिकासाहित्य संमेलनातून भारताची आर्थिक प्रगती आणि विकास यांवर खोचक टीका करणारे गिरीश कुबेर संमेलनाच्या आयोजनातील आर्थिक काटकसरीविषयीही काही भाष्य करतील का ? |
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !