(प्रागैतिहासिक काळ म्हणजे मानवी इतिहासातील तो काळ ज्याला कोणतेही लिखित पुरावे नाहीत. हा काळ साधारणपणे २५ लाख वर्षांपूर्वी चालू होऊन इसवी सन पूर्व ३००० ते २००० पर्यंत चालला.)
१. धर्मध्वजातील चिन्हांचे महत्त्व
भारतीय ज्ञानपरंपरेच्या विविध पैलूंमध्ये असलेल्या माझ्या रुचीमुळे या ध्वजावर दर्शवलेल्या ३ पवित्र चिन्हांनी, म्हणजेच ॐ (ओम), सूर्य आणि कोविदार वृक्ष यांनी माझे विशेष लक्ष वेधून घेतले. प्रत्येक चिन्हाचे स्वतंत्र आणि गहन महत्त्व आहे.
अ. ॐ (ओम) : विश्वनिर्मितीच्या आद्यस्पंदनाचे प्रतीक, ज्यातून संपूर्ण सृष्टी उद्भवते.
आ. सूर्य : प्रभु श्रीरामाचा इक्ष्वाकू – सूर्यवंशीय परंपरेशी असलेला दिव्य संबंध, तेज आणि शक्ती यांचे प्रतीक.
इ. कोविदार वृक्ष (कांचन / माऊंटन एबनी) : बुद्धीमत्ता, सात्त्विकता, सद्गुणांचा विजय, धर्माची प्रतिष्ठा आणि शुभफल यांचे प्रतीक. ‘वाल्मीकि रामायणा’मध्ये कोविदार हा अयोध्येच्या राजचिन्हांपैकी एक म्हणून उल्लेखिला आहे.
‘इंडोलॉजिस्ट’ (भारतविद्या अभ्यासक) ललित मिश्र यांनी मेवाड चित्ररामायणातील विशिष्ट चित्राचा अभ्यास करतांना कोविदार वृक्षाच्या या प्रतीकाची ओळख पटवली. त्यानंतर उपलब्ध पाठसाक्षांनी याची पुष्टी झाल्याने ध्वजावर या प्रतीकाचा स्वीकार करण्यात आला. ‘वाल्मीकि रामायणा’च्या ‘अयोध्याकांडा’त लक्ष्मणाने भरताच्या सैन्याला त्यांच्या पताकांवरील या विशेष चिन्हावरून ओळखल्याचा उल्लेख आढळतो.
काही काश्मिरी, हिमालयीन आणि शैव परंपरा यांतील आधुनिक मौखिक कथांमध्ये कोविदार वृक्ष हा मंदर आणि पारिजात यांच्या संयोगातून ऋषि कश्यप यांनी निर्मिलेला असल्याचे वर्णन आढळते. तथापि सखोल ग्रंथपरंपरेच्या अभ्यासातून हे लक्षात येते की, हे वर्णन प्रतिकात्मक सृष्टी-तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे, जैविकदृष्ट्या हे सत्य नाही. प्रत्यक्षात कोविदार ही भारतीय जंगलात नैसर्गिकरित्या आढळणारी मूळ प्रजाती आहे. मंदार, पारिजात आणि कोविदार ही तीनही झाडे भिन्न कुळांतील असल्याने त्यांचे नैसर्गिक संकर अस्तित्वात येत नाही.
२. पुराण, इतिहास, संस्कृत साहित्य आणि आयुर्वेदाची ग्रंथपरंपरा यांमध्ये कोविदार वृक्षाचे महत्त्व
अ. संस्कृत साहित्यात कोविदाराचा उल्लेख कुठेही संकरज प्रजाती म्हणून नाही, तर ‘पुण्यवृक्ष’ आणि ‘शुभद्रुम’ म्हणून आहे. ‘महाभारत (वनपर्व २८०)’मध्ये कोविदार वृक्षाचा उल्लेख आहे.
आ. ‘वाल्मीकि रामायणा’मध्ये कोविदार वृक्षाचा उल्लेख आहे.
इ. कालिदाससारखे शास्त्रीय कवीही ‘मेघदूत (पूर्वमेघ ५५)’मध्ये कोविदाराचा गौरव करतात, ज्यात ‘कोविदाराच्या फुलांचा सडा’ असा उल्लेख आहे. ‘कुमारसम्भवम्’मध्ये ते ‘कोविदारांच्या फुलांनी वसंत उगवतो,’ असे सादर करतात, ‘जे सौंदर्य, पल्लवितता आणि शुभ नूतनीकरणाचे प्रतीक आहे.’
ई. अग्नि, पद्म आणि स्कंद पुराणांसह अनेक पुराणे मंदिरे, तीर्थक्षेत्रे, आश्रम अन् पवित्र नगरे यांसाठी त्याची शिफारस स्पष्टपणे करतात.
उ. वराहमिहिर यांच्या ‘बृहद्संहिता (अध्याय ५५)’मध्ये बागेच्या वास्तूकलेविषयी कोविदाराचा उल्लेख आहे आणि बागांसाठी, तसेच वास्तूस्नेही परिसरसाठी ते शुभ मानले गेले आहे.
ऊ. नाट्यशास्त्रात विधी सजावटीसाठी (मंगलालंकार) कोविदार फुलांचा वापर सुचवला आहे.
ए. अमरकोशात ‘कोविदारः कञ्चनारः’ असा उल्लेख असून हे पूज्य वृक्षांमध्ये त्याच्या पवित्र स्थानाची पुष्टी करतो.
ऐ. आयुर्वेदात कोविदाराचे साल, मूळ, फुले, पाने, बिया या सर्व घटकांचा औषधी उपयोग आहे. तो कफ-पित्तशामक, विशुद्धीकारक आणि लसिका शुद्धीकरक मानला जातो. स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित विकारांमध्ये, सूज, गाठी, चयापचय संतुलन यांसाठी हे महत्त्वाचे औषध आहे.

श्रीरामजन्मभूमीच्या विध्वंसाला ५०० वर्षे उलटल्यानंतर अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे श्रीराममंदिराचे पुनर्निर्माण पूर्ण होताच २५ नोव्हेंबर २०२५ या दिवशी धर्मध्वजरूपी पवित्र भगव्या पताकेला समारंभपूर्वक मंदिराच्या शिखरावर आरोहित करण्यात आले, ज्यामुळे मंदिराचे पूर्णत्व सूचित होते. अभिजीत नक्षत्रात साजर्या होणार्या विवाह पंचमी या पवित्र मुहूर्तावर हा समारंभ पार पडला. विक्रम संवत् पंचांगातील अग्रहायण (नोव्हेंबर-डिसेंबर) मासाच्या शुक्ल पक्षातील पंचमीला साजरी केली जाणारी विवाह पंचमी ही श्रीराम-सीतेच्या दैवी विवाहाची स्मृती म्हणून संपूर्ण मिथिला प्रदेशातील जनकपूरधाम, तसेच श्रीरामाशी निगडित विविध तीर्थक्षेत्रांमध्ये अत्यंत भक्तीभावाने साजरी केली जाते. ध्वज हा श्रीरामाच्या धर्माचा तेजस्वी आणि शाश्वत प्रतीक आहे.
लेखिका : प्रा. (सौ.) वर्षा नाईक, गोवा गृहशास्त्र महाविद्यालय, गोवा.
३. सूर्य, ‘आदित्यहृदय स्तोत्र’ आणि ‘ॐ’ (ओम) यांचा संबंध
वाल्मीकि रामायणातील ‘आदित्यहृदय स्तोत्र’ हे सूर्यदेवाची स्तुती करणारे आणि विजय प्रदान करणारे अत्यंत शक्तीशाली प्रार्थनास्तोत्र आहे. ‘रणांगणात रावणाचा सामना करतांना थकलेले आणि निरुत्साहित झालेल्या प्रभु श्रीरामाला महर्षि अगस्त्य यांनी हे स्तोत्र उपदेशिले’, असे म्हटले जाते. या स्तोत्राच्या पुरश्चरणाने श्रीरामाला पुन्हा शक्ती, आत्मविश्वास आणि धैर्य प्राप्त झाले अन् त्यातून त्यांचा अंतिम विजय संभवला. या स्तोत्रातील एका मुख्य श्लोकात सूर्यदेवाचे सर्वव्यापी आणि विश्वव्यापी स्वरूप वर्णिलेले आहे.
एष ब्रह्मा च विष्णुश्च शिवः स्कन्दः प्रजापतिः ।
महेन्द्रो धनदः कालो यमः सोमो ह्यपां पतिः ॥
– आदित्यहृदय स्तोत्र
अर्थ : हा ब्रह्मा, विष्णु, शिव, कार्तिकेय, प्रजापती, महेंद्र, कुबेर, काल, यम, चंद्र आणि वरुण आहे.
ॐ (ओम) हे ईश्वराचे सामर्थ्यशाली पवित्र प्रतीक म्हणून पूजले जाते, ब्रह्माचे नाव, सर्व सृष्टीचे कारण, स्रोत आणि पाया. सर्वांत सामर्थ्यशाली आणि नैसर्गिक ध्वनी म्हणून ॐ (ओम) प्रार्थना आणि ध्यानात उच्चारित केले जाते, जेणेकरून सुसंगती, शांती, अंतर्गत सामर्थ्य अन् आनंद जागृत होईल. पारंपरिक श्रद्धेनुसार ॐ हे सृष्टीच्या निर्मितीच्या क्षणी उत्पन्न झालेले पहिले शाश्वत कंपन होते, जे ध्वनीच्या संपूर्ण घटनांचा समावेश करते. हे प्राणव म्हणून ओळखले जाते, शुद्ध चेतनेचा प्रवाह जो प्राण (जीवनश्वास) मध्ये वहातो. ॐ हेही दर्शवते की, सर्व रूपे ब्रह्मांडीय स्रोतापासून उद्भवतात आणि शेवटी त्या स्रोताकडे परत जातात.
उपनिषदांमध्ये ॐ हे आद्यकंपन म्हणून वर्णन केले आहे, ज्यापासून विश्व प्रकट होते. मनोरंजक म्हणजे आधुनिक क्वांटम भौतिकी-विशेषतः क्वांटम क्षेत्र सिद्धांत, भौतिक विश्वाचे उद्भव मूलभूत क्षेत्रांच्या कंपनांमधून होते, असे स्पष्ट करते, जिथे कंपन कण आणि पदार्थ निर्माण करतात. जरी ॐ हा आध्यात्मिक आणि तात्त्विक संकल्पना आहे अन् ‘क्वांटम भौतिकी’ ही वैज्ञानिक शाखा आहे, तरी दोन्ही कंपन, ऐक्य आणि खोलवर परस्पर संबंधिततेवर आधारित विश्वाची कल्पना करतात. त्यामुळे ॐ चे प्रतीकात्मक महत्त्व आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोनाशी अद्भुतरित्या सुसंगत आहे, जे प्राचीन ज्ञान आणि समकालीन विज्ञान यांच्यातील एक शाश्वत सेतू सिद्ध करते.
४. धर्मध्वज, श्रीराममंदिर आणि भारतीय संस्कृती
श्रीराममंदिराची पुनर्बांधणी आणि अयोध्येत धर्मध्वजाचे विधीवत् ध्वजारोहण हे धार्मिक भावना ओलांडून भारतीय सांस्कृतिक ओळखीच्या दीर्घकालीन प्रवाहाचे प्रतिनिधित्व करणारे एक शक्तीशाली सांस्कृतिक प्रतीक आहे.
पुरातत्वीय, साहित्यातील आणि चित्रात्मक परंपरा पवित्र स्थळांच्या संकल्पना, अक्षीय मंदिरे अन् विधीध्वज यांचा उगम कांस्यपूर्व भारतीय संस्कृतीपर्यंत शोधण्यात आला. तिथे सार्वभौमत्व, ब्रह्मांडीय व्यवस्था, तसेच समुदायाच्या ओळखीची चिन्हे सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग होती.
इतिहासात रामभक्ती परंपरेने सामाजिक समता आणि जातीसुधारणेला चालना दिली. संत रामानंद, संत तुलसीदास, संत एकनाथ यांसारख्या संतांनी जन्माधिष्ठित भेद दूर करून सर्वांना भक्तीमध्ये समाविष्ट केले. शबरीप्रती श्रीरामाचे सन्मान, निषादराजाशी मैत्री आणि वानर-वनवासी समुदायांशी सहयोग हे वर्णापलीकडील आदर्श ठरले. आधुनिक काळात अयोध्या श्रीराममंदिरानेही विविध जातसमुदायांतील कारागीर, पुरोहित आणि भक्त यांना समान सहभाग देऊन या परंपरेचा वारसा पुढे नेला. आजचे श्रीराममंदिर संकुल हे केवळ धार्मिक स्थळ नसून भारतीय प्राचीन संस्कृतीचा वारसा, जातीसुधारणा आणि सांस्कृतिक पुनरुत्थान यांचे केंद्र म्हणून उदयास येत आहे.


उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?