बांगलादेशातील हिंदु युवकाच्या हत्येचा आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्याकडून तीव्र निषेध

अमरावती (आंध्रप्रदेश) – जनसेना पक्षाचे प्रमुख आणि आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी बांगलादेशातील हिंदु युवक दीपू चंद्र दास यांच्या अमानुष हत्येबद्दल तीव्र दुःख आणि संताप व्यक्त केला आहे.
A PRAYER FOR THE SOUL OF DIPU CHANDRA DAS
History remembers sacrifice. But today, the soil that was once liberated with Indian blood is being stained with the blood of innocent minorities.
In 1971, our Indian Armed Forces stood for the oppressed. Our brave soldiers didn’t…
— Pawan Kalyan (@PawanKalyan) December 19, 2025
सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना त्यांनी सांगितले की, ही घटना मानवतेच्या अधःपतनाचे प्रतीक आहे. वर्ष १९७१ मध्ये भारतीय सैनिकांनी त्यांच्या रक्ताने ज्या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्याच भूमीवर आज निष्पाप अल्पसंख्यांकांची हत्या होत आहे.
🚨 Strong words from Andhra Pradesh Dy CM 🚨
“The land liberated by India is today stained with the blood of minorities.”
– Pawan Kalyan condemns the brutal murder of a Hindu youth in Bangladesh.🌍 The silence of the international community is a betrayal of human rights.
⚠️… https://t.co/NuAXh2HSZ8 pic.twitter.com/92w5ZMqnA1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 20, 2025
पवन कल्याण यांनी आकडेवारीचा उल्लेख करत सांगितले की,
वर्ष १९५१ मध्ये बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या सुमारे २२ टक्के होती, ती आता ८ टक्क्यांपेक्षाही अल्प राहिली आहे. ही केवळ स्थलांतराची गोष्ट नसून अल्पसंख्यांकांना लक्ष्य करून पद्धतशीरपणे होणार्या छळाचेच द्योतक आहे. इस्कॉन मंदिरातील संत चिन्मय दास यांची अटक आणि त्यानंतर दीपू दास यांना झाडाला लटकवून जाळण्याची घटना, तेथे कायद्याचे राज्य संपुष्टात आल्याचे दर्शवते.
🚨 Bangladesh: Brutal Religious Persecution 🚨
A Hindu youth was burnt alive over a false allegation of insulting Prophet Muhammad.
This isn’t isolated violence. It’s a repeating pattern;fabricated charges, mob lynchings, targeted killings of Hindus in Bangladesh.
This is… pic.twitter.com/CHAZ0zagZE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 20, 2025
आंतरराष्ट्रीय समुदायाची शांतता हा मानवी हक्कांवरील विश्वासघात !
पवन कल्याण यांनी बांगलादेशातील नेतृत्व आणि संयुक्त राष्ट्रे यांना या अमानवी कृत्याचा केवळ निषेध न करता दोषींना कठोर शिक्षा देण्याचे आवाहन केले आहे. भारतीय हुतात्मांनी शांततेसाठी बलीदान दिले होते, अल्पसंख्यांकांवरील अशा अत्याचारांसाठी नव्हे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आंतरराष्ट्रीय समुदायाची शांतता हा मानवी हक्कांवरील विश्वासघात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
संपादकीय भूमिकाभारतातील किती शासनकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! हिंदूंच्या रक्षणाविषयी हिंदूच निष्क्रीय असल्याने शासनकर्तेही तसेच झालेले आहेत ! |
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !
शहरवासियांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा ! – निमेश नायर
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump