
नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – १५ मार्च २०२४ या दिवशी संच मान्यतेच्या आदेशावर अनेक शिक्षक संघटना न्यायालयामध्ये गेल्या. त्यावर २ सुनावण्याही झालेल्या आहेत. उच्च न्यायालयाने १४ नोव्हेंबर २०२५ या दिवशी दिलेल्या निर्णयान्वये सदर याचिका निकाली काढून १५ मार्च २०२४ मधील तरतुदी वैध असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे प्रत्येक शाळेतील प्रत्येक वर्गात शिक्षक दिला जाईल, हे शासनाचे दायित्व आहे, असे उत्तर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिले.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, ‘‘आधीच्या काळात दुर्गम, डोंगराळ भाग होता. आता विकासकामांतून दुर्गम, डोंगराळ भाग राहिलेला नाही. ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्या त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध करून देण्याचे दायित्व सरकारचे आहे.’’
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !