
नवी देहली : रिझर्व्ह बँकेच्या आकडेवाडीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ६ लाख १५ सहस्र ६४७ कोटी रुपयांची एकत्रित कर्ज रक्कम गेल्या साडेपाच वर्षांत माफ केली, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. या बँकांनी १ एप्रिल २०२२ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत भाग आणि कर्जरोखे यांद्वारे बाजारातून १ लाख ७९ सहस्र कोटी रुपये भांडवल उभारल्याचेही मंत्री चौधरी यांनी सांगितले. २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कोणतीही भांडवली गुंतवणूक केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
सप्टेंबर २०२५ पर्यंत गेल्या साडेचार वर्षांत ३ सहस्र ५८८ कोटी २२ लाख रुपयांच्या फसवणुकीचे ५ लाख ८३ सहस्र २९१ गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी २३८ कोटी ८३ लाख रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती मंत्री चौधरी यांनी दिली.
लोहगडावरील मृत्यू घातपातच !
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !