झाडाला मिठी मारता, तशी बकरीला का मारत नाही ? – नितेश राणे, मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री भाजप

नितेश राणे

मुंबई – बकरी ईदच्या वेळी हे पर्यावरण आणि प्राणी प्रेमी गप्प का असतात ?  कुंभमेळा हा हिंदूंसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा आहे. हे तथाकथित पर्यावरण आणि प्राणी प्रेमी अन्य धर्मांच्या उत्सवांवर कधीही असे प्रश्न उपस्थित करत नाहीत. देशात खरोखरच सर्वधर्मसमभाव असेल, तर केवळ हिंदूंच्याच सण-उत्सवांवर हरकती का घेतल्या जातात ? ईदच्या वेळी मोठ्या प्रमाणात बकर्‍यांची हत्या होते, रक्ताचे पाणी रस्त्यांवर वहाते, पर्यावरण आणि स्वच्छता यांचा प्रश्न निर्माण होतो; पण त्याविरोधात हे ‘प्रेमी’ कधी बोलतांना दिसत नाहीत. ‘व्हर्च्युअल’ (आभासी) बकरी ईद साजरी करा’, असे कुणी म्हणत नाही. मग एका धर्माला एक न्याय आणि दुसर्‍या धर्माला दुसरा न्याय का ? झाडाला मिठी मारता तशी बकरीला मारता का ? बकरीला मिठी मारून तिची हत्या थांबवून दाखवावी, अशा सडेतोड प्रश्नांची सरबत्ती भाजपचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पर्यावरणप्रेमींवर केली.

नाशिक येथे होणार्‍या कुंभपर्वासाठी साधूग्रामची उभारणी करण्यासाठी काही वृक्ष तोडावे लागणार असल्याने कथित आणि ‘राजकीय’ पर्यावरणप्रेमींनी त्याला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

ते या वेळी म्हणाले की, झाडे जगली पाहिजेत, यात दुमत नाही. समितीने अत्यंत विचारपूर्वक आणि काटेकोर निर्णय घेतला आहे. पर्यावरणप्रेमाच्या नावाखाली कुंभपर्व आणि हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचा डाव चालू आहे. लोकांच्या खांद्यावर बंदुक ठेवून हिंदु धर्माला लक्ष्य केले जात आहे. हा भाजप किंवा राष्ट्रवादी यांचा प्रश्न नाही; मी हिंदु म्हणून प्रश्न विचारत आहे. वृक्षतोडीला विरोध करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी ईदला किमान ५ बकर्‍यांची कुर्बानी तरी थांबवून दाखवावी. उत्तरप्रदेशातील महाकुंभाच्या वेळी ‘त्रिवेणी संगमातील पाण्याने खाज येते’ अशा अफवा पसरवल्या होत्या. हिंदूंच्या उत्सवाची अपकीर्ती करण्याचा हा डाव आहे.