आहारासंबंधी प्रतिदिन पाळावयाचे नियम !

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

सकाळी ६ वाजण्याच्या आत उठावे. पोट साफ झाल्यावरच काहीही आहार किंवा द्रव पोटात घ्यावे. न्याहारी सगळ्यांना सक्तीची नाही. कफ प्रकृती, अजीर्ण, भूक लागलेली नसल्यास, उन्हाळा-पावसाळा या ऋतूंमध्ये न्याहारी करू नये; परंतु अशा वेळी जेवण मात्र दुपारी १ वाजण्याच्या आत करावे. संध्याकाळचे जेवण ७.३० वाजण्याच्या आत झालेले चांगले. ते जेवण चांगले पचते आणि प्रमेह, हृदयरोग यांसारखे आहार-विहार संबंधित आजार होत नाहीत.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, पुणे.