
कोल्हापूर, १ नोव्हेंबर – गेली अनेक वर्षे सीमाभागातील लोक कर्नाटक सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात १ नोव्हेंबर हा ‘काळा दिवस’ म्हणून पाळतात. मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी आणि सीमालढ्यात मृत्यूमुखी पडलेल्या विरांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातील शिवसेनेचे पदाधिकारी बेळगावकडे जातात. असे असले, तरी प्रत्येक वर्षी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदीच्या पुलावर कर्नाटक पोलीस शिवसैनिकांना अडवतात. यंदाही कोल्हापूर येथून मोठ्या संख्येने शिवसैनिक बेळगावकडे जाण्यास निघाले असता कागलजवळ कर्नाटक पोलिसांनी त्यांना रोखले.
या प्रसंगी ‘बेळगाव, बीदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या पदाधिकार्यांना कागल पोलीस ठाण्यात आणून नंतर सोडून देण्यात आले. यात मुख्यत्वेकरून सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष धैर्यमाने यांना पोलिसांनी पुलावर अडवले. या वेळी काही काळ पुणे-बेंगळुरू महामार्गावर मोठा तणाव निर्माण झाला होता, तसेच काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
| उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनाही दूधगंगा नदी पुलावर अडवण्यात आले. या प्रसंगी तेथे उपस्थित असणारे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे म्हणाले, ‘‘बेळगाव येथे फेरी काढणार्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही जात असतांना आम्हाला पोलिसांनी रोखले. बेळगाव, बीदर-भालकीसह अनेक गावे महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत असतांना कर्नाटक सरकार मात्र त्यांची गळचेपी करत आहे, याचा आम्ही निषेध करतो.’’ |
| महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न इतकी वर्षे प्रलंबित ठेवणे हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद ! |
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !