
मुंबई – काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार पक्ष आणि मनसे यांच्या वतीने १ नोव्हेंबर या दिवशी मतचोरीच्या सूत्रावर मुंबई येथे सरकारविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा उद्धव बाळासाहेब गटाचे आमदार अनिल परब यांनी ३० ऑक्टोबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाद्वारे विरोधक मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकतील, असा अंदाज आहे.
आमदार अनिल परब म्हणाले की, हा मोर्चा १ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजता ‘फॅशन स्ट्रीट’ येथून चालू होईल. नंतर मेट्रो चित्रपटगृहमार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबेल. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाचा दायित्वशून्य कारभार, मतांमधील घोळ, मतांचा गैरव्यवहार आदी सूत्रांच्या विरोधात हा ‘सत्याचा मोर्चा’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना सत्य कळावे आणि असत्य जनतेपुढे जावे, यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष अन् मनसे या मोर्चात सहभागी होतील.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !