
मुंबई – काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार पक्ष आणि मनसे यांच्या वतीने १ नोव्हेंबर या दिवशी मतचोरीच्या सूत्रावर मुंबई येथे सरकारविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा उद्धव बाळासाहेब गटाचे आमदार अनिल परब यांनी ३० ऑक्टोबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाद्वारे विरोधक मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकतील, असा अंदाज आहे.
आमदार अनिल परब म्हणाले की, हा मोर्चा १ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजता ‘फॅशन स्ट्रीट’ येथून चालू होईल. नंतर मेट्रो चित्रपटगृहमार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबेल. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाचा दायित्वशून्य कारभार, मतांमधील घोळ, मतांचा गैरव्यवहार आदी सूत्रांच्या विरोधात हा ‘सत्याचा मोर्चा’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना सत्य कळावे आणि असत्य जनतेपुढे जावे, यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष अन् मनसे या मोर्चात सहभागी होतील.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !