
मुंबई – काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार पक्ष आणि मनसे यांच्या वतीने १ नोव्हेंबर या दिवशी मतचोरीच्या सूत्रावर मुंबई येथे सरकारविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा उद्धव बाळासाहेब गटाचे आमदार अनिल परब यांनी ३० ऑक्टोबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाद्वारे विरोधक मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकतील, असा अंदाज आहे.
आमदार अनिल परब म्हणाले की, हा मोर्चा १ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजता ‘फॅशन स्ट्रीट’ येथून चालू होईल. नंतर मेट्रो चित्रपटगृहमार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबेल. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाचा दायित्वशून्य कारभार, मतांमधील घोळ, मतांचा गैरव्यवहार आदी सूत्रांच्या विरोधात हा ‘सत्याचा मोर्चा’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना सत्य कळावे आणि असत्य जनतेपुढे जावे, यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष अन् मनसे या मोर्चात सहभागी होतील.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !