हिंदु राष्ट्रासाठी सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना !

मुंबई – बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री हे मुंबई दौर्यावर होते. त्या वेळी त्यांनी ‘भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी ७ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत देहली ते वृंदावन अशी पदयात्रा काढणार’, असे घोषित केले. त्यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्या वेळी भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. ‘हिंदूंच्या प्रयत्नांतूनच हे हिंदु राष्ट्र होणार आहे’, असेही ते या वेळी म्हणाले. ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) यांसारख्या मानसिकतेला थारा देऊ नका. त्याची अनुमती समाज किंवा राज्यघटना देत नाही’, असे ते या वेळी म्हणाले.
🔥 BIG Announcement! 🔥
Pandit Dhirendrakrishna Shastri will lead a 'Padayatra' for the establishment of the Hindu Nation! 🚩
After praying to Shri Siddhivinayak, he affirmed: "It is the commitment of Hindus that will manifest the Hindu Rashtra."
He Added : There is no room… pic.twitter.com/UkUoMyBkjz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 13, 2025
बंगालमध्ये लवकरच कथावाचनासाठी जाणार आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले. बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने पुराचे कारण सांगत पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना बंगालमध्ये कथावाचनाची अनुमती नाकारली होती. त्या वेळी त्यांनी ‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सत्तेत असेपर्यंत बंगालमध्ये जाणार नाही’, असे म्हटले होते. ‘भारतातील लव्ह जिहाद बंद झाला पाहिजे’, अशी चेतावणीही त्यांनी या वेळी दिली.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले