शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे विधान
(ए.आय.एम्.आय.एम्. म्हणजे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन, म्हणजेच अखिल भारतीय मुसलमान एकता संघ)

पाटलीपुत्र (बिहार) – गोरक्षणाचा पुरस्कार करणार्या कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा संघटनेला, अगदी ‘ए.आय.एम्.आय.एम्.’ पक्षालाही आम्ही पाठिंबा देऊ. हिंदु आणि हिंदुत्व यांच्या नावाखाली मते मागणारे लोक गोरक्षणाविषयी गप्प का आहेत ?, असा प्रश्न शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी उपस्थित केला. ते राज्यातील शिवहरमध्ये आले होते.
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati: “If AIMIM awards the Gorakshan prize, we will support it!”
📍 Patliputra, Bihar – Swami Avimukteshwaranand questioned why those seeking votes in the name of Hindus and Hindutva remain silent on cow protection.
He emphasized:… pic.twitter.com/3pfenf8N5W
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 6, 2025
शंकराचार्य पुढे म्हणाले की,
गायी कोणत्याही विशिष्ट जाती, पंथ किंवा पक्ष यांच्या नसून संपूर्ण भारताची ओळख आहेत. गायीच्या नावाखाली राजकारण करणारे गोसेवेसाठी प्रत्यक्षात काय करत आहेत ? गाय ही भारतीय संस्कृती, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यांचा पाया आहे. गोरक्षण हे संपूर्ण राष्ट्राचे कर्तव्य आहे. आमची निष्ठा कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही, तर गोमाता आणि सनातन धर्म यांच्याशी आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh