
अक्कलकोट – ‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट’ यांच्या वतीने जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या आवाहनास प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना ५० लाख रुपये किमतीच्या ५ सहस्र जीवनावश्यक शिधासंचांचे वितरण करण्यात येणार आहे, तसेच मंडळाच्या सहयोगी ‘हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थे’च्या वतीने १ सहस्र पूरग्रस्त महिलांना साड्या देण्यात येतील, अशी माहिती कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ’ हे गेली ३८ वर्षे अन्नदान, तसेच सामाजिक आणि धर्मादाय कार्यात सातत्याने कार्यरत असून, पूरग्रस्तांना साहाय्य करणारी सोलापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठी संस्था ठरली आहे.
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू