‘१२.९.२०२५ या दिवशी आम्ही हरवळे (गोवा) येथे महालय श्राद्धविधी केला. तेव्हा पितरांना अन्न ठेवण्यात आले. त्या वेळी प्रथम एका कावळ्याने त्यातील थोडे अन्न ग्रहण केले. त्यानंतर तेथे एक चिमणी येऊन तिने ते अन्न ग्रहण केले. पितरांना दिलेले अन्न चिमणीने ग्रहण करण्याच्या संदर्भात मला सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान पुढे दिले आहे.

१. काही पितर त्यांच्यासाठी ठेवलेले अन्न
कावळ्याऐवजी चिमणीद्वारे ग्रहण करत असण्याचे कारण
अ. आईच्या गर्भात मृत्यू झालेल्या मुलीचा लिंगदेह.
आ. १ ते १२ वर्षांपर्यंत मृत्यू झालेल्या मुलीचा लिंगदेह.
इ. विवाहानंतर अल्प कालावधीत पतीचे निधन झाल्याने पुष्कळ दुःखी झालेल्या विधवा स्त्रीचा लिंगदेह.
असे पितर ‘पुढील गती मिळणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी श्राद्धाच्या वेळी ठेवलेले अन्न प्राप्त करणे’, यांसाठी प्रथम ते कावळ्याच्या शरिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात; परंतु त्या पितरांच्या तुलनेत कावळ्याची शक्ती अधिक असल्यास त्यांना कावळ्याच्या शरिरात प्रवेश करता येत नाही.
त्यानंतर असे पितर चिमणीच्या शरिरात प्रवेश करतात; कारण चिमणीची शक्ती कावळ्याच्या तुलनेत अल्प असते. त्यामुळे काही पितर चिमणीद्वारे श्राद्धाच्या वेळी त्यांच्यासाठी ठेवलेले अन्न ग्रहण करून तृप्त होतात. त्यानंतर त्या पितरांना पुढील गती मिळण्यास साहाय्य होते.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक, वेळ आणि एकूण कालावधी : १९.९.२०२५, सकाळी १०.३०, ५ सेकंद)
|
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !