
पुणे – वाहतूककोंडी होणार्या शहरात पुणे जगात चौथ्या क्रमांकावर आहे. पुण्यात १० कि.मी. अंतर जाण्यासाठी ३३ मिनिटे लागतात. त्यामुळे इच्छित स्थळी जाण्यासाठी नागरिकांना नियोजित वेळेच्या १ घंटा पूर्वी घराबाहेर पडावे लागते. याचा नागरिकांच्या जीवनावर वाईट परिणाम होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलीस प्रयत्न करत आहेत; पण रस्त्यावर पडलेले खड्डे, ओबडधोबड ‘पॅचवर्क’ (खड्डयात खडी आणि डांबर टाकून रस्ता दुरुस्ती करणे), हातगाडी, पथारी, रस्त्यावरील दुकाने, पादचारी मार्गावर झालेली अतिक्रमणे, अवैध बांधकामे यांमुळे परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. शहरातील ३२ प्रमुख रस्ते आणि २२ चौक या ठिकाणी वाहतूककोंडी का होत आहे ? याची कारणे शोधून, २२ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर शर्मा यांनी महापालिका प्रशासनातील सर्व विभागांना दिले आहेत.
ही माहिती संकलित करून पुढील बैठकीत चर्चा करून उपाययोजना करण्यात येणार आहे.
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष