पंतप्रधान मोदी यांनी मणीपूरमधील हिंसाचारग्रस्त चुराचंदपूरला दिली भेट !

इंफाळ (मणीपूर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पूर्वाेत्तर भारताच्या ३ दिवसांच्या दौर्यावर आहेत. २ वर्षांपूर्वी ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांनी हिंदु मैतेयींवर आक्रमण केलेल्या चुराचंदपूरलाही पंतप्रधानांनी भेट दिली. हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या विस्थापित लोकांना पंतप्रधान भेटले. पंतप्रधान म्हणाले की, संवाद, आदर आणि परस्पर समंजसपणा, यांना महत्त्व देऊन शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले जात आहे. मी सर्व संघटनांना शांततेच्या मार्गाने पुढे जाण्याचे आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे आवाहन करतो.
पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !
१. मणीपूरची ही धैर्य आणि शौर्य यांची भूमी आहे. या टेकड्या निसर्गाची एक मौल्यवान देणगी आहे. मणीपूरच्या नावातच मणी असून हाच मणी येणार्या काळात संपूर्ण ईशान्य भागाची चमक वाढवणार आहे.
२. एक काळ असा होता, जेव्हा देहलीत घेतलेले निर्णय येथे पोचण्यासाठी दशके लागायची. आज आपले चुराचंदपूर, आपले मणीपूर, देशाच्या इतर भागांसह प्रगती करत आहे.
३. सरकारने मणीपूरमध्ये ७ सहस्र ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे.
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !