
घाटनांद्रा – लासूर स्टेशन येथील क्षीरसागर कुटुंबाने यंदा महालक्ष्मीमातेच्या देखाव्यातून पहलगाम आक्रमण आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा देखावा साकारला आहे. सायली योगेश क्षीरसागर यांनी अत्यंत बारकाईने हा देखावा सिद्ध केला. १ सप्टेंबर या दिवशी त्यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवरांनी भेट देऊन या देखाव्याचे कौतुक केले. ‘वैजापूर मर्चंट बँकेचे संचालक आणि युवा उद्योजक प्रीतमशेठ मुथा यांनी देखाव्याचे विशेष कौतुक केले.
महालक्ष्मी उत्सवाच्या निमित्ताने क्षीरसागर कुटुंब गेली १३ वर्षे विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करत आहे. यामध्ये ‘स्वच्छ भारत अभियान, महाड-सावित्री नदी दुर्घटना, कोल्हापूर पूरस्थिती, हर घर तिरंगा, जल जीवन मिशन, लाडकी बहीण योजना’ अशा विषयांचा समावेश होता. यावर्षी पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवादी तळांवर केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईचे हुबेहूब चित्रण करण्यात आले होते. भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करणारा हा देखावा पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
सत्संगात नसलेल्यांची स्थिती भरकटलेल्या पतंगासारखीच – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास