मणिमहेश यात्रेतील ८ सहस्र भाविकांना सुरक्षित बाहेर काढले !

शिमला (हिमाचल प्रदेश) – मुसळधार पाऊस आणि भूस्खलन यांमुळे राज्यातील चंबा जिल्ह्यात अडकलेले जम्मू-काश्मीरचे अनुमाने मणिमहेश यात्रेच्या ८ सहस्र भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. भरमौर आणि हडसर येथे अडकलेल्या उर्वरित भाविकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर चालू आहेत. येथे अजूनही दोन ते अडीच सहस्र भाविक अडकले आहेत.