श्रीकृष्ण सर्वज्ञ असल्याने त्यांनी सांदीपनींच्या आश्रमात फक्त ८ दिवस राहून १४ विद्या आणि ६४ कला आत्मसात् करणे

पू. अनंत आठवले

पू. अनंत आठवले : व्यासांनी ब्रह्मसूत्र लिहिले आहे. ब्रह्मसूत्र वाचले, तर काही कळणार नाही. त्यांनी फक्त सूत्रात सांगितले. त्यामुळे सगळ्यांना ते कळले नसेल. शंकराचार्यांनी त्याच्यावर भाष्य करून ठेवले आहे; म्हणून ते आपल्याला कळते, नाहीतर ब्रह्मसूत्र आपल्याला कळलेच नसते. शंकराचार्यांचे ज्ञान किती असेल ! केवळ ३२ व्या वर्षांपर्यंत त्यांनी किती लिहून ठेवले आहे ! हे सगळे त्यांचे पूर्वजन्मीचेच ज्ञान असेल. आपण म्हणतो, ते आधीच्या जन्मांच्या संस्कारामुळे होते, फक्त काही कारणामुळे ब्रह्मात विलीन झाले नव्हते. ते या जन्मात आल्याबरोबर कशाने तरी ते जागृत झाले. भगवान् श्रीकृष्ण सांदीपनींच्या आश्रमात गेले. तेथे फक्त ८ दिवस राहिले होते. त्यांनी १४ विद्या आणि ६४ कला आत्मसात् केल्या.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो. ८ दिवसांत कृष्णाचे सगळे शिक्षण पूर्ण झाले; कारण त्याला आधीच सगळे येत होते.

पू. अनंत आठवले : श्रीकृष्ण फक्त ८ दिवस सांदीपनींच्या आश्रमात होते. ८ दिवसांत एवढ्या विद्या आणि एवढे ज्ञान. मी नॉन स्टॉप (न थांबता) बोलत राहिलो, तरी माझे सांगूनही होणार नाही. योगवासिष्ठ ग्रंथात वसिष्ठांनी उल्लेख केला आहे. रामाने वसिष्ठांना काही प्रश्न विचारले. वसिष्ठांनी सांगितले, ‘‘तुम्ही स्वतः विष्णूचे अवतार आहात. तुम्हाला सगळे माहितीच आहे; पण तुम्ही म्हणत आहात, प्रश्न विचारत आहात, मग मी तुम्हाला सांगतो.’’ त्यानंतर वसिष्ठांनी रामाला ज्ञान दिले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मी इकडे येतो, ते बरे आहे ना ! मला खूप शिकायला मिळते.

(५.१०.२०२४ या दिवशी पू. अनंत आठवले आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात झालेल्या संभाषणाचा निवडक भाग)