
‘या भूतलावर अध्यात्माच्या संदर्भात अनेक ग्रंथ आहेत. या ग्रंथांमधील ज्ञान संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त असे आहे; पण यातील काही ज्ञान सर्वसामान्यांना कळणे कठीण आहे. त्यामुळे त्यांचा खर्या अर्थाने लाभ होत नाही. यासाठी वाटत होते की, यातील आवश्यक ते ज्ञान निवडून त्यांचे सोप्या भाषेतील ग्रंथ करावेत, जेणेकरून त्याचा सर्वांना लाभ होईल. त्यासाठी गेले ४० वर्षे मी सहस्रो ग्रंथांतील लिखाण निवडले. त्यांतील काही ज्ञान ३७० हून अधिक ग्रंथांतून प्रकाशितही झाले आहे.
पुढे लक्षात आले की, या ग्रंथांची व्याप्ती इतकी आहे की, ते कार्य एका जन्मात होण्यासारखे नाही. त्यामुळे काही वेळा ‘मोक्षाला न जाता केवळ मानवजातीसाठी उपयुक्त ग्रंथ लिखाणासाठी पुनःपुन्हा जन्म घ्यावा’, असे वाटायचे किंवा ‘देवा, आध्यात्मिक ग्रंथांतील मजकूर निवडण्यासाठी मला खूप जन्म दे’, अशी प्रार्थना करावी, असाही विचार येत असे; पण हे अनंताचे ज्ञान आहे. हे कार्य पुढच्या-पुढच्या पिढ्यांमध्ये सुरूच राहील !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२०.५.२०२६)
अध्यात्मशास्त्रासंदर्भात कांहीही संशोधन न करणारे हे कसले बुद्धीप्रामाण्यावादी ?
उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्या आणि गुरुदेवांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी (वय ८९ वर्षे) !
शांत, स्थिर आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अनुसंधानात असलेले अकलूज येथील श्री. विष्णु जाधव !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ देवलोकात होत असल्याची साधिकेला आलेली प्रचीती !