‘नर्दुल्ला टँक मैदान, प्रभादेवी, मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने १७ मे २०२६ या दिवशी ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ’ दिव्य वातावरणात पार पडला. या महायज्ञाच्या पूर्वसिद्धतेच्या सेवेत असलेले श्री. विष्णु जाधव यांची साधकाच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. सेवा समयमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सेवांचा प्राधान्यक्रम ठरवून देणे
नर्दुल्ला टँक मैदान येथे महायज्ञासाठी भव्य मंडप उभारण्यात येत होता. श्री. विष्णु जाधवकाका हे कार्यस्थळ निर्मितीच्या सेवेत होते. ते सांगत असलेल्या सूत्रांमुळे सेवा योग्य प्रकारे होण्यासाठी साधकांना दिशा मिळाली. ‘सेवा समयमर्यादेत पूर्ण करण्यासाठी कोणत्या कृती प्राधान्याने करायला हव्यात’, याचे मार्गदर्शन जाधवकाकांनी वेळोवेळी केले. त्यामुळे सेवा गतीने पूर्ण होण्यास साहाय्य झाले.

२. कंत्राटदाराला सेवा समयमर्यादेत करण्यासाठी उद्युक्त करणे
कंत्राटदाराकडून अनेक गोष्टी करून घ्यायच्या होत्या. जाधवकाकांनी कंत्राटदाराला समयमर्यादेत सेवा करण्यासाठी उद्युक्त केले. जाधवकाकांनी कंत्राटदाराकडून सेवा वेळेत पूर्ण करून घेतल्या.
३. साधकांचा विचार करणे
उन्हात सेवा करणार्या साधकांना ‘उन्हाचा त्रास होऊ नये’, यासाठी त्यांना ‘पाणी, सरबत त्याचप्रमाणे ‘ओ.आर्.एस्.’ (टीप) हे देण्याची व्यवस्था कशा प्रकारे हवी ?’, याविषयी जाधवकाकांनी सुचवले.
(ओ.आर्.एस्. – जलसंजीवनी. उन्हात काम केल्यास शरिरातील पाणी आणि इतर महत्त्वाचे घटक यांचे प्रमाण न्यून होते. तेव्हा ते भरून काढण्यासाठी ‘ओ.आर्.एस्.’ हे मिश्रण देण्यात येते.)

४. शांत आणि स्थिर राहून अडचणींवर मात करणे
काही वेळा साधक सेवा करत असतांना अडचणी येत असत. तेव्हा जाधवकाका शांत आणि स्थिर राहून प्रसंग हाताळत असत. त्यांचे स्मितहास्य पाहून साधकांना सेवा करण्यासाठी उत्साह वाटत असे.
५. जाधवकाका नेहमी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अनुसंधानात असतात.’
– श्री. बळवंत पाठक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४२ वर्षे), मुंबई (२०.५.२०२६)
उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्या आणि गुरुदेवांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी (वय ८९ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
अध्यात्माचे अनंतत्त्व !
मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ देवलोकात होत असल्याची साधिकेला आलेली प्रचीती !
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !