मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संत शिरोमणी नामदेव महाराज, परिवार आणि संत जनाबाई महाराज यांचा ६७५ वा संजीवन समाधी सोहळा !

पंढरपूर – समाजातील शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्य धारेत आणणार्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणी अन् वाणीने देशभर पोचवणार्या संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात येईल. त्यांचे विचार हे त्यांचे खरे स्मारक असून हे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंढरपूर येथे आयोजित श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, परिवार आणि संत जनाबाई यांच्या ‘षष्ठ शतकोत्तर संजीवन समाधी सोहळा’ कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘श्री नामदेव क्षत्रिय एकसंघ’चे राष्ट्रीय अध्यक्ष महेश ढवळे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, आचार्य तुषार भोसले, ह.भ.प. केशव महाराज नामदास, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘भारताच्या सर्व दिशांना जोडण्याचे आणि खर्या अर्थाने भागवत धर्मातील विचार वैश्विक करण्याचे कार्य त्यांनी केले. आपला पारंपरिक व्यवसाय जरी त्यांनी केला नसला तरी सामाजिक समरसतेचे वस्त्र विणण्याचे, संपूर्ण व्यवस्था पालटण्याचे आणि समाजाला एकतेचे मूल्य देण्याचे कार्य नामदेव महाराजांनी केले. संत कबीर, दादू, गरीबदास यांनी विचारांची प्रेरणा संत नामदेवांकडून घेतली. आपल्या संतभूमीत अभंगांच्या माध्यमातून संतांचा हा विचार आपल्यापर्यंत पोचला आहे. संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधीच्या निमित्ताने नामदेव पायरीचे दर्शन घेणे आणि तेथील ऊर्जा प्राप्त करून घेणे हा भाग्याचा दिवस असून या पायरीच्या दर्शनाने प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते. नामदेव महाराजांच्या अभंगात ‘पायरिचे चिरे’ असा उल्लेख आहे, त्यानी याच भावनेने आपले कार्य केले.’’
क्षणचित्रे

१. प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखवण्यात आला.
२. मुख्यमंत्र्यांनी श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या परिवारातील त्यांचे वंशज ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास आणि अन्य संतांचे पदपूजन केले.
३. श्री संत नामदेव महाराज यांच्या कार्याची माहिती आणि महिमा लोकांपर्यंत पोचण्यासाठी सिद्ध केलेल्या विशेष संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
४. याप्रसंगी चांदीच्या विशेष नाण्याचे विमोचन करण्यात आले.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !