शिमला – अतीवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशमध्ये १५० घरे कोसळली, तर ६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशने ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता गमावली आहे. हवामान विभागाने ७ जुलै २०२५ पर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
१. मंडी जिल्ह्यातील थुनाग सर्वाधिक प्रभावित आहे. येथील रस्ते बंद आहेत. वीज आणि पाणी यांचा पुरवठा देखील थांबला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापनाने हानी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
२. पीडितांसाठी साहाय्यता शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. हवाईदलाकडून अन्नाची पाकिटे पुरवण्यात येत आहेत.
३. पुरात १६४ गुरेही ठार झाली आहेत. एकूण ४०२ लोकांना वाचवण्यात यश आले आहे.
४. शिमलामध्येही भूस्खलन झाले आहे. सुदैवाने तेथे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक