शिमला – अतीवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशमध्ये १५० घरे कोसळली, तर ६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशने ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता गमावली आहे. हवामान विभागाने ७ जुलै २०२५ पर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
१. मंडी जिल्ह्यातील थुनाग सर्वाधिक प्रभावित आहे. येथील रस्ते बंद आहेत. वीज आणि पाणी यांचा पुरवठा देखील थांबला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापनाने हानी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
२. पीडितांसाठी साहाय्यता शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. हवाईदलाकडून अन्नाची पाकिटे पुरवण्यात येत आहेत.
३. पुरात १६४ गुरेही ठार झाली आहेत. एकूण ४०२ लोकांना वाचवण्यात यश आले आहे.
४. शिमलामध्येही भूस्खलन झाले आहे. सुदैवाने तेथे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी