‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा गोवा येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’निमित्त शुभसंदेश !

मुंबई – सनातन संस्थेच्या माध्यमातून गेली २५ वर्षे अविरतपणे हिंदु राष्ट्रासाठी जागरण करत असलेले परमश्रद्धेय डॉ. जयंत आठवले यांचे कार्य अलौकिक आणि अत्यंत विलक्षण आहे. त्यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ महोत्सव नसून भारताला पुन्हा तेजस्वी, समर्थ बनवण्याचा आणि सनातन धर्माची पुनर्स्थापना करण्याचा जागर आहे, असे गौरवोद्गार ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी महोत्सवासाठी पाठवलेल्या शुभसंदेशात काढले आहेत.
१. ‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपूर्वी आरंभलेल्या कार्याची फलश्रुती म्हणून आज सहस्रोंच्या संख्येने समर्पित कार्यकर्ते ठिकठिकाणी जाऊन निष्काम भावनेने आणि स्वयंशिस्तीने सनातन धर्माचा प्रसार करत आहेत.
"A 25-year journey through @SanatanSanstha is now bearing fruit with thousands dedicated to propagating Sanatan Dharma!"
– H.H. Swami Govind Dev Giri Maharaj (@GovindaDevGiri) hails the Sanatan Rashtra Shankhnaad Mahotsav in Goa as an awakening to restore India's glory and… pic.twitter.com/EjxRZUrwy1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 28, 2025
२. या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवनाचा स्वाध्याययज्ञ, सेवायज्ञ आणि लोकजागरणयज्ञ चालू केला आहे. हे कार्य अत्यंत विलक्षण आहे आणि त्यातूनच सनातन राष्ट्राच्या अभ्युदयाचा मार्ग उजळणार आहे.
३. या महोत्सवात विविध राष्ट्रनिष्ठ नेते, धर्माचार्य, कार्यकर्ते आणि सनातनप्रेमी एकत्र येऊन विचारमंथन करणार आहेत. या मंथनातून केवळ नवनीत नव्हे, तर अमृत उदयाला येईल. याच अमृतकलशातून सनातन राष्ट्राला नवतेज प्राप्त होईल.
४. आज भारताला समर्थ राष्ट्र बनवायचे असेल, तर सनातन धर्माच्या मूलभूत तत्त्वांची पुनर्स्थापना करणे अत्यावश्यक आहे; कारण भारताच्या सामर्थ्यावरच जगात समता, बंधुता आणि खरी स्वतंत्रता टिकू शकते; म्हणूनच हे कार्य एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या संस्थेचे नसून, राष्ट्र-धर्माचे कार्य आहे; म्हणूनच हे प्रत्यक्ष भगवानाचे कार्य आहे.
५. सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रनिष्ठ कार्यकर्ते, नेते, धर्मगुरु आणि सामान्य भक्त यांनी या महोत्सवात सहभागी होऊन श्रद्धा आणि सेवाभाव यांचे योगदान द्यावे.
६. सनातन धर्माचे मूळ अधिक बळकट करण्यासाठी आणि भारताच्या सुंदर, समृद्ध भविष्यासाठी हा महोत्सव म्हणजे सुवर्णसंधी आहे. या महामंथनातून मिळणार्या तेजाने भारत गगनभरारी घेईल आणि सनातन धर्माचा दिव्य प्रकाश संपूर्ण जगात पसरेल; म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन या दिव्य कार्यात सहभागी होऊया आणि भारताला त्याच्या सनातन तेजाने पुन्हा उभे करूया.