गौरवशाली भारताने विश्‍वाला दिलेल्या देणग्या !

१. भारताची गौरवशाली इतिहासाची परंपरा ! 

चाणक्य, सम्राट अशोक, राणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे हे वीरपुरुष भारतातलेच ! त्यांच्यामुळेच तर भारताचा इतिहास अजरामर झाला आहे.

२. सर्व धर्मांचा आदर करणारा एकमेव देश भारत !

३. भारतानेच सर्वांना विश्‍वबंधुत्वाची शिकवण दिली !

४. रामायण आणि महाभारत यांसारखे यांसारख्या अद्वितीय महाग्रंथांची निर्मिती याच भारतातील !

५. एकमेवाद्वितीय असे योगशास्त्र आणि आयुर्वेद यांचा निर्माता भारत !

६. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्यकला, शिल्पकला भारतातूनच सर्वत्र वृद्धींगत झाल्या !

७. जगातील पहिला शल्यचिकित्सक सुश्रुत हा भारतातील होता.

८. भास्कराचार्य, आर्यभट्ट, वागभट्ट, मिहिराचार्य यांसारखे थोर गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ  यांचा मोठा वारसा भारताला लाभला !

९. ‘०’ ही संकल्पना भारताने जगाला दिली !

१०. जाज्वल्यता आणि बाणेदार असणार्‍या जिजामातेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा  युगपुरुष लाभला ! त्यांचे गोडवे आजही विश्‍वभरात गायले जातात. 

ही केवळ प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. भारताने विश्‍वाला काय दिले नाही, असे होऊच शकत नाही; कारण भारताकडून मिळालेल्या देणगीची सूची अमर्याद आणि कधीही न संपणारी अशी अखंड आहे; म्हणूनच तर हा भारत सर्वांसाठी ‘भाग्यविधाता’ ठरत आहे !

– एक राष्ट्राभिमानी नागरिक