१. भारताची गौरवशाली इतिहासाची परंपरा !
चाणक्य, सम्राट अशोक, राणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे हे वीरपुरुष भारतातलेच ! त्यांच्यामुळेच तर भारताचा इतिहास अजरामर झाला आहे.
२. सर्व धर्मांचा आदर करणारा एकमेव देश भारत !
३. भारतानेच सर्वांना विश्वबंधुत्वाची शिकवण दिली !
४. रामायण आणि महाभारत यांसारखे यांसारख्या अद्वितीय महाग्रंथांची निर्मिती याच भारतातील !
५. एकमेवाद्वितीय असे योगशास्त्र आणि आयुर्वेद यांचा निर्माता भारत !
६. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्यकला, शिल्पकला भारतातूनच सर्वत्र वृद्धींगत झाल्या !
७. जगातील पहिला शल्यचिकित्सक सुश्रुत हा भारतातील होता.
८. भास्कराचार्य, आर्यभट्ट, वागभट्ट, मिहिराचार्य यांसारखे थोर गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ यांचा मोठा वारसा भारताला लाभला !
९. ‘०’ ही संकल्पना भारताने जगाला दिली !
१०. जाज्वल्यता आणि बाणेदार असणार्या जिजामातेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष लाभला ! त्यांचे गोडवे आजही विश्वभरात गायले जातात.
ही केवळ प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. भारताने विश्वाला काय दिले नाही, असे होऊच शकत नाही; कारण भारताकडून मिळालेल्या देणगीची सूची अमर्याद आणि कधीही न संपणारी अशी अखंड आहे; म्हणूनच तर हा भारत सर्वांसाठी ‘भाग्यविधाता’ ठरत आहे !
– एक राष्ट्राभिमानी नागरिक

जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील ढिसाळ कारभार आणि नागरिकांची फरफट !
शास्त्रांनुसार पूजेमध्ये वर्जित गोष्टी
वैदिक सरस्वती नदी आणि तिचे दैवी स्वरूप !
भारताची ‘सांस्कृतिक स्वातंत्र्य रणनीती’: सैन्यदलाच्या ‘ड्रेस कोड’ (वस्त्रसंहिता) पालटातून उलगडणारे धडे !
बळीप्रथेला विरोध करणारे आणि कर्मकांडापेक्षा मन:शुद्धीस महत्त्व देणारे संत कबीर !
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !