
प्रयागराज – महाकुंभपर्वात सरकारच्या आरोग्य विभागाकडून पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी हे पथनाट्य सादर करून त्याद्वारे अस्वच्छतेमुळे होणारे विषाणुंचे आक्रमण आणि त्यामुळे येणारे आजारपण आदींविषयी माहिती दिली जात आहे. यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.