चुकीचा इतिहास शिकवला, याविषयी काँग्रेस क्षमा मागणार का ? – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

(उजवीकडे) देवेंद्र फडणवीस

मुंबई – काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडी यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान केला नाही. पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणांमध्ये कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेखही केला नाही.

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आला. याविषयी काँग्रेस कधी क्षमा मागणार ? काँग्रेसने चुकीचा इतिहास शिकवला, याविषयी कधी क्षमा मागणार ? असे प्रश्न भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे प्रतिक्रिया व्यक्त करतांना उपस्थित केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट दुर्गावरील पुतळा कोसळल्याविषयी महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या आंदोलनाविषयी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस बोलत होते.