आपण काँग्रेसची निंदा करतो; परंतु तिने केलेले राष्ट्रघातकी कायदे अद्यापही अस्तित्वात !

अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय

देशात लव्ह जिहाद, धर्मांतर चालू आहे. याचे कारण अपराध्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. कायद्याची भीती निर्माण करण्याचे काम सरकार आणि प्रशासन यांचे आहे. धर्मांतराच्या विरोधात मी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. हे रोखण्यासाठीचा कायदा संसदेत एका दिवसात होऊ शकतो. मोगल आणि इंग्रज सत्तेसाठी नव्हे, तर धर्माचा प्रचार करण्यासाठी भारतात आले होते. त्यांचे कायदे आजही भारतात लागू आहेत. आपण काँग्रेसची निंदा करतो; परंतु काँग्रेसने केलेले राष्ट्रघातकी कायदे अद्यापही भारतात आहेत.

– अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय