भय घालवण्यासाठी प्रयत्न करायला हवा !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

आईच्या कुशीत तान्हे लेकरू निर्भय असते, त्याप्रमाणे साधनेच्या संदर्भात साधकाचे झाले पाहिजे. योगक्षेमाची चिंता वाहणे, हाही भयाचाच प्रकार आहे आणि हे सर्व कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हवे-नको यांच्याशीच जोडलेले रहाते. तेव्हा आपल्या मनस्थितीचा चांगला शोध घेऊन एकेक दोषाचा निरास प्रयत्नपूर्वक केला पाहिजे. अंतःकरण निर्भय असले की, एकांतवास सुखावह होतो.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘आत्मसंयोगयोग’)