स्वामी विवेकानंद यांची शिकवण

पर्वतप्राय अडचणी समोर उभ्या राहिल्या, तरी त्यांच्यावर मात करण्याची प्रचंड इच्छाशक्ती तुमच्या ठिकाणी आहे का ? तलवार उपसून सारे जग तुमच्या विरुद्ध उभे राहिले, तुमच्या बायका-मुलांनी साथ दिली नाही, तरी तुम्हाला जे योग्य वाटते, जे सत्य वाटते, ते प्रत्यक्ष करून दाखवण्याची धमक तुमच्यात आहे का ? तुमची सगळी धनदौलत नष्ट झाली, तुमचा सर्व नावलौकिक नाहीसा झाला, तरी सत्याला चिकटून रहाण्याचे धाडस तुमच्यामध्ये आहे का ? अशा परिस्थितीतही सत्याचेच अनुसरण करत तुम्ही आपल्या ध्येयाच्या मार्गावर नेटाने पुढे पुढे जात रहाल का ?
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !