
वसिष्ठऋषि, विश्वामित्रऋषि, भृगुऋषि, अत्रिऋषि, अगस्तिऋषि, नारदमुनी इत्यादींची शिकवण आणि नावे युगानुयुगे चिरंतन आहेत. याउलट बुद्धीवान आणि धर्मद्रोही अन् बुद्धीप्रामाण्यवादी यांची नावे १ – २ पिढ्यांतच विसरली जातात. याचे कारण हे की, ऋषिमुनी सत्य सांगतात; म्हणून काळ त्यांच्या नावाला आणि शिकवणीला स्पर्श करू शकत नाही. याउलट बुद्धीवान आणि धर्मद्रोही अन् बुद्धीप्रामाण्यवादी सांगतात ते सत्य नसल्याने काळाच्या ओघात त्यांची नावे आणि शिकवण विसरली जाते.
‘ऋषींनी सगुण-निर्गुण, पंचमहाभूते, कालमाहात्म्य, कर्मफलन्याय, पुनर्जन्म इत्यादींविषयी सांगितले नसते, तर अध्यात्म कधी शब्दांत मांडता आले असते का ?’
‘एखादा वरवरचा भौतिक शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञांना वर्षानुवर्षे संशोधन करावे लागते. त्यात पुढे इतर शास्त्रज्ञ पालटही करतात. याउलट ऋषिमुनींना सूक्ष्मातून मिळणार्या ज्ञानामुळे संशोधन करावे न लागता क्षणात सूक्ष्मातीसूक्ष्म सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि ती अंतिम सत्य असल्यामुळे कुणाला त्यांत पालट करता येत नाहीत.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !