भाजपने माझा सल्ला ऐकला नाही ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी देहली – ‘भाजप कमीतकमी २२० जागा जिंकेल, असा अंदाज मी वर्तवला होता, तो आता समोर आलेल्या २३७ या आकडेवारीच्या अगदी जवळ जाणारा आहे.

भाजपने माझा सल्ला ऐकला असता, तर त्यांना ३०० चा आकडा गाठता आला असता; पण दुर्दैवाने मोदी यांच्या हुकूमशाही मानसिकतेमुळे भाजप खड्ड्यात गेला आहे, ज्यातून आता पक्षाला बाहेर पडावे लागेल, अशी पोस्ट भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केली आहे.