
नवी देहली – पारपत्र केवळ भारतीय नागरिकांनाच दिले जात असले, तरी त्यावरून एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व सिद्ध होत नाही, असे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मतदार सूचीच्या सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या वेळी असाच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. ‘आधार कार्ड’ हा केवळ ओळखीचा पुरावा असून तो नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही’, असे न्यायालयाने म्हटले होते.
परराष्ट्र मंत्रालयाने नवीन ‘चिप-आधारित’ ‘ई-पासपोर्ट’विषयी माहिती दिली. या पारपत्रामध्ये ‘बायोमेट्रिक डेटा’ सुरक्षित ठेवला जात असल्याने जागतिक स्तरावर त्याला सहज संमती मिळते, तसेच फसवणूक आणि बनावट पारपत्र सिद्ध होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर अल्प होतो, असे मंत्रालयाने सांगितले.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !