छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वांत अल्प ८.७८ टक्के पाणीसाठा शेष

पुणे – राज्यामध्ये असलेल्या लहान-मोठ्या २ सहस्र ९९७ धरणांनी तळ गाठला आहे. सध्या ३१५ अब्ज घनफूट (टी.एम्.सी.) म्हणजे अवघा २२.०६ टक्के पाणीसाठा शेष राहिला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वांत अल्प ८.७८ टक्के पाणीसाठा असून, त्या खालोखाल पुणे विभागात १५.६७ टक्के पाणी आहे. गेल्या वर्षी मेअखेरीस ३०.९४ टक्के पाणीसाठा होता.
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, राज्यात ३१ मे अखेरीस सर्व धरणांत मिळून ३१५ टी.एम्.सी. इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. नागपूर विभागात ३८.१७ टक्के, अमरावती विभागात ३८.५६ टक्के, नाशिक विभागात २४.०६ टक्के, पुणे विभागात १५.६७ टक्के आणि कोकण विभागात ३४.२२ टक्के पाणीसाठा आहे. यांपैकी बहुतेक धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. अनेक धरणांतून शेतीला किंवा पिण्यासाठी पाणी सोडण्यास कालव्यांची सुविधा नाही. त्यामुळे धरणांत पाणी असूनही त्याचा शेती किंवा पिण्यासाठी थेट वापर करता येत नाही. गुरांसाठीच्या पाण्याची सोयही अवेळी पावसामुळे झाली आहे.
संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !