चिनी हस्तकांनी ठेवले होते ओलीस !

नोम पेन्ह (कंबोडिया) – भारतीय दूतावासाने कंबोडियामध्ये चिनी हस्तकांनी ओलीस ठेवलेल्या ३६० भारतियांची सुटका केली आहे. पीडितांना आधी नोकरीचे आमीष दाखवून नंतर ओलीस ठेवण्यात आले होते. आता सर्वांना लवकरच भारतात आणण्याची सिद्धता चालू आहे. त्यांपैकी ६० भारतीय नागरिकांची पहिली तुकडी मायदेशी परतली आहे.
At least 360 Indian citizens working as “cyber slaves” in Cambodia rescued by the Indian Embassy
They were kept hostage by Chinese handlers
They were trapped by agents by luring them with huge salaries in foreign countries, and used to get cyber fraud done through them.… pic.twitter.com/pcy1sINodL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 24, 2024
कंबोडियातील भारतीय दूतावासाला काही फसव्या नोकरी पुरवठादारांनी (चिनी दलालांनी) भारतियांना पकडून ठेवल्याची बातमी मिळाली होती. या भारतियांची २० मे या दिवशी जिनबेई-४ नावाच्या ठिकाणाहून अधिकार्यांनी सुटका केली. ही कारवाई सिहानोकविले येथील अधिकार्यांच्या समन्वयाने पार पडली.
यापूर्वीच भारतीय दूतावासाने कंबोडियाला नोकरीसाठी जाणार्या लोकांसाठी एक मार्गदर्शिका प्रसारित केली आहे.
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण