
बेंगळुरू – ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’च्या (‘सीएए’च्या) अंतर्गत कर्नाटकातून एकूण १४५ लोकांनी भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. रायचूर येथून १४३, तर दक्षिण कन्नड येथून २ अर्ज आले आहेत. यांमध्ये सर्वाधिक लोक हे पाकिस्तानमधून आलेले हिंदू आहेत.
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून ३१ डिसेंबर २०१४ च्या आधी आलेले हिंदू, शीख, ख्रिस्ती, जैन आणि पारसी यांना ‘सीएए’च्या अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यात येत आहे.

११ मार्च २०२४ पासून भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर अधिसूचना काढण्यात आली होती. पोस्ट आणि रेल्वे कर्मचार्यांना प्रमाणपत्रे तपासणे आणि वितरित करणे, हे दायित्व देण्यात आले आहे. ‘सीएए’ कायद्याच्या अंतर्गत नागरिकत्वासाठी संपूर्ण देशात अनुमाने १२ सहस्र लोकांनी अर्ज केले असून आतापर्यंत ३०० लोकांना नागरिकत्व देण्यात आले आहे.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !