
बेंगळुरू – ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’च्या (‘सीएए’च्या) अंतर्गत कर्नाटकातून एकूण १४५ लोकांनी भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. रायचूर येथून १४३, तर दक्षिण कन्नड येथून २ अर्ज आले आहेत. यांमध्ये सर्वाधिक लोक हे पाकिस्तानमधून आलेले हिंदू आहेत.
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून ३१ डिसेंबर २०१४ च्या आधी आलेले हिंदू, शीख, ख्रिस्ती, जैन आणि पारसी यांना ‘सीएए’च्या अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यात येत आहे.

११ मार्च २०२४ पासून भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर अधिसूचना काढण्यात आली होती. पोस्ट आणि रेल्वे कर्मचार्यांना प्रमाणपत्रे तपासणे आणि वितरित करणे, हे दायित्व देण्यात आले आहे. ‘सीएए’ कायद्याच्या अंतर्गत नागरिकत्वासाठी संपूर्ण देशात अनुमाने १२ सहस्र लोकांनी अर्ज केले असून आतापर्यंत ३०० लोकांना नागरिकत्व देण्यात आले आहे.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !