‘वर्षाच्या प्रारंभीच त्या वर्षात घडणार्या बर्या-वाईट घडामोडींविषयी माहिती कळल्यास त्याप्रमाणे उपाययोजना करून आधीच तरतूद करून ठेवणे सोपे जाते. हाच वर्षफल ऐकण्याचा खरा लाभ असतो. म्हणून पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकायचे असते. याची काही उदाहरणे पाहू.

१. पाऊस लवकर चालू होणार असेल, तर त्या बेताने शेताची मशागत अगोदर करून ठेवता येते.
२. पावसात खंड पडणार असेल किंवा पावसाचे प्रमाण न्यून असेल, तर अशा वेळी विहिरी वगैरेंचा उपयोग व्हावा म्हणून लागणारे पाट, तळी वगैरे सर्व नीट करून ठेवता येते.
३. दुष्काळ पडणार असेल, तर धान्य आणि वैरण यांची काटकसर करून किंवा ज्या देशांत सुबत्ता होणार किंवा झालेली असेल, तेथून धान्य, वैरण आणून साठा करावा आणि येणार्या अडचणीच्या काळाची तजवीज करून ठेवता येते.
४. कोणती पिके होण्याचा संभव आहे, ते जाणून त्याप्रमाणे बियाणे, खत वगैरे आणून ठेवता येते.’
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?