मुलांच्या जीवनशैलीत सकारात्मक पालट होण्यासाठी ‘बालसंस्कार’ हे एकमेव प्रभावी माध्यम आहे !

कुटुंब, शाळा आणि समाज यांच्या प्रयत्नांतून मुलांमध्ये नैतिक मूल्ये अन् राष्ट्रप्रेम विकसित होते !

संस्कारशील होण्यासाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा !

• स्वभाषेचा अभिमान बाळगा !

• हिंदु संस्कृतीनुसार वेशभूषा परिधान करा !

• छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडदुर्गांना भेटी द्या !

• परदेशी वस्तूंवर बहिष्कार घाला आणि स्वदेशी वस्तू वापरा, तसेच स्वदेशी खेळ खेळा !

विद्यार्थ्यांनी करावयाचे आदर्श संकल्प !

• मी सत्य, प्रामाणिकपणा, शिस्त आणि परिश्रम यांचा स्वीकार करीन.

• आई-वडील, गुरुजन आणि वडीलधारे यांचा आदर करीन.

• राष्ट्रप्रेम, सेवाभाव यांसह चांगल्या वाचनाची सवय जोपासीन.

•  स्वतःला सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न आणि आदर्श नागरिक बनवण्यासाठी प्रयत्न करीन.

मुलांनो, याची उत्तरे स्वतः शोधा !

• माझ्यातील सर्वांत चांगला गुण कोणता आहे ?

• माझ्यातील कोणता दोष मला घालवायचा आहे ?

• मी कोणत्या महापुरुषाला आदर्श मानतो ? आणि का ?

• माझ्या जीवनाचे ध्येय काय आहे ?

• माझ्या कृतींमुळे कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांना काय लाभ होणार आहे ?

• मी स्वतःमध्ये कोणता सकारात्मक पालट करणार आहे ?