संदेशखालीच्या प्रकरणात १ टक्केही सत्यता असल्यास सरकारला लज्जास्पद ! – कोलकाता उच्च न्यायालय

कोलकाता उच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेसला फटकारले

कोलकाता (बंगाल) – संदेशखाली प्रकरणात १ टक्काही सत्यता असेल, तर ते लज्जास्पद आहे. याला संपूर्ण प्रशासन आणि सत्ताधारी १०० टक्के नैतिकदृष्ट्या उत्तरदायी  आहेत. हा लोकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न आहे, अशा शब्दांत कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला फटकारले. संदेशखाली येथे तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान याने स्थानिक हिंदु महिलांचा लैंगिक छळ करून तेथील हिंदूंची भूमी बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात खटला चालू आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने सरकारला फटकारले.